शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मराठी आरमारचा मानबिंदू ‘किल्ले सुवर्णदुर्ग’, जाणून घ्या इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:11 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या मोजक्या जलदुर्गांची उभारणी केली, त्यात सुवर्णदुर्गचे नाव

-महेश कदम, इतिहास अभ्यासक, रत्नागिरीछत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या मोजक्या जलदुर्गांची उभारणी केली, त्यात सुवर्णदुर्गचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दक्षिण कोकणात जसा सिंधुदुर्ग, त्यासम मध्य कोकणात सुवर्णदुर्ग आहे. सन १६६० ते १६६५च्या दरम्यान, एका बेटावर शिवरायांनी याची उभारणी केली. यासंबंधी, ‘हर्णे खेड्याजवळ त्याने (शिवाजीराजे) मजबूत किल्ला बांधला.’ असा महत्त्वाचा उल्लेख ७ डिसेंबर १६६४च्या डच रिपोर्टमध्ये आहे. सन १६७१/७२ साली स्वराज्यातील गडांच्या बांधकाम तसेच दुरुस्तीकरिता सुमारे १,७५,००० होन शिवरायांनी मंजूर केले. यातील १०,००० होन सुवर्णदुर्गसाठी खर्च होणार होते.शिवकाळात सुवर्णदुर्ग किल्ला व हर्णे बंदराचा उपयोग, पाऊस काळात मराठी आरमारातील गलबते नांगरण्यासाठी करण्यात येत असे. पुढील काळात ‘समुद्रातील शिवाजी’ असा लौकिक प्राप्त केलेल्या कान्होजी आंग्रेंचा जन्म व कारकीर्द, सुवर्णदुर्गच्या साक्षीने सुरू झाली आणि हा किल्ला मराठी आरमाराचे बलाढ्य ठाणे म्हणून विख्यात झाला.शिवरायांच्या जलदुर्ग बांधणी स्थापत्यानुसार साकारलेली सुवर्णदुर्गची खणखणीत तटबंदी, लहान-मोठ्या आकाराचे २४ बुरूज, महादरवाजा, पडकोट, दारूकोठार, चोरदरवाजा, वाड्याचे अवशेष, तोफा आदी गोष्टी पाहता येतात. परंतु सध्या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात बोरीची झाडे वाढल्यामुळे, बहुतांशी अवशेष झाकोळले गेले आहेत अथवा उद्ध्वस्त झाले आहेत.

हनुमान प्रतिमादोन बुलंद बुरुजात लपवलेल्या, गोमुखी बांधणीच्या महादरवाजाशेजारी तटबंदीवर हनुमंताचे शिल्प साकारले आहे. शिवरायांनी उभारलेल्या प्रत्येक जलदुर्गावर प्रवेशद्वारात हनुमंताचे दर्शन होते. येथेही असाच वीर मुद्रेतील गदाधारी मारुतीराया कालनेमी राक्षसाच्या मस्तकी पाय ठेवून उभा असलेला दिसतो. आताच्या सुवर्णदुर्गावरील ही एकमेव देवता असावी. कारण, किल्ल्यात याशिवाय दुसरे मंदिर अस्तित्वात नाही अथवा ते काळाच्या ओघात नष्ट झाल्याची शक्यता आहे.

सुवर्णदुर्गच्या ऐतिहासिक घटना

  • सरखेल आंग्रे घराण्याचा सुवर्णदुर्ग मुख्य ठाणे होता. सन १७५० नंतर मराठा साम्राज्यात, पेशवे-तुळाजी आंग्रे संघर्ष टोकास पोहोचला. तुळाजीचे मुख्य सागरी शत्रू असणाऱ्या इंग्रजांशी तह करून, नानासाहेब पेशव्यांनी सन १७५५ मध्ये तुळाजीच्या प्रदेशावर आक्रमण केले. इंग्रज सेनानी कमोदर जेम्सने समुद्रातून व पेशव्याचा सरदार रामजी बिवलकर याने जमिनीमार्गे सुवर्णदुर्गवर हल्ला केला. या संदर्भात, ‘जंजिरे सुवर्णदुर्ग येथे सरकारची मोर्चेबंदी झाली होती. गोवा, फत्तेगड, कनकदुर्ग या तिही स्थळास निशाण चढोण, सुवर्णदुर्गात निशाण चढवावयासी नेले होते.’ असे एप्रिल १७५५ मध्ये त्रिंबक विनायक याने पेशव्यास कळविले.
  • इंग्रजांच्या जहाजांनी सुवर्णदुर्गास चहूबाजूने वेढा दिला, त्यांच्या जबरदस्त तोफा-बंदुकाच्या माऱ्याने किल्ला हादरून गेला. ११ एप्रिल १७५५ रोजी इंग्रजी सैन्याने सुवर्णदुर्गचा भक्कम दरवाजा, कुऱ्हाडीने घाव घालून फोडला आणि पेशव्यांचे निशाण किल्ल्यास लागले. यानंतर मराठी आरमाराचे प्रमुख झालेल्या धुळपांनी सुवर्णदुर्ग लढाऊ बनवला.
  • सन १७७४ साली कोकणात इंग्रज-मराठे युद्धाचे ढग जमू लागले. तेव्हा सुवर्णदुर्गचा किल्लेदार लखमोजी खानविलकरने, ‘यैसियासी जंजिरे सुवर्णदुर्गी चौकी, पहारा, अलंग नोबत बहुत सावधतेने करीत आहो. लढाईचे बच्चावाचे तरतूदही आज्ञेप्रमाणे व दर्यात गलबताचे छबिने (गस्त) येस करितो. जंजिराचे पश्चिमेकडील इमारतीचे काम तडक चालिले आहे.’ असे पत्र पेशव्यांना लिहिले.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज