शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी आरमारचा मानबिंदू ‘किल्ले सुवर्णदुर्ग’, जाणून घ्या इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:11 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या मोजक्या जलदुर्गांची उभारणी केली, त्यात सुवर्णदुर्गचे नाव

-महेश कदम, इतिहास अभ्यासक, रत्नागिरीछत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या मोजक्या जलदुर्गांची उभारणी केली, त्यात सुवर्णदुर्गचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दक्षिण कोकणात जसा सिंधुदुर्ग, त्यासम मध्य कोकणात सुवर्णदुर्ग आहे. सन १६६० ते १६६५च्या दरम्यान, एका बेटावर शिवरायांनी याची उभारणी केली. यासंबंधी, ‘हर्णे खेड्याजवळ त्याने (शिवाजीराजे) मजबूत किल्ला बांधला.’ असा महत्त्वाचा उल्लेख ७ डिसेंबर १६६४च्या डच रिपोर्टमध्ये आहे. सन १६७१/७२ साली स्वराज्यातील गडांच्या बांधकाम तसेच दुरुस्तीकरिता सुमारे १,७५,००० होन शिवरायांनी मंजूर केले. यातील १०,००० होन सुवर्णदुर्गसाठी खर्च होणार होते.शिवकाळात सुवर्णदुर्ग किल्ला व हर्णे बंदराचा उपयोग, पाऊस काळात मराठी आरमारातील गलबते नांगरण्यासाठी करण्यात येत असे. पुढील काळात ‘समुद्रातील शिवाजी’ असा लौकिक प्राप्त केलेल्या कान्होजी आंग्रेंचा जन्म व कारकीर्द, सुवर्णदुर्गच्या साक्षीने सुरू झाली आणि हा किल्ला मराठी आरमाराचे बलाढ्य ठाणे म्हणून विख्यात झाला.शिवरायांच्या जलदुर्ग बांधणी स्थापत्यानुसार साकारलेली सुवर्णदुर्गची खणखणीत तटबंदी, लहान-मोठ्या आकाराचे २४ बुरूज, महादरवाजा, पडकोट, दारूकोठार, चोरदरवाजा, वाड्याचे अवशेष, तोफा आदी गोष्टी पाहता येतात. परंतु सध्या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात बोरीची झाडे वाढल्यामुळे, बहुतांशी अवशेष झाकोळले गेले आहेत अथवा उद्ध्वस्त झाले आहेत.

हनुमान प्रतिमादोन बुलंद बुरुजात लपवलेल्या, गोमुखी बांधणीच्या महादरवाजाशेजारी तटबंदीवर हनुमंताचे शिल्प साकारले आहे. शिवरायांनी उभारलेल्या प्रत्येक जलदुर्गावर प्रवेशद्वारात हनुमंताचे दर्शन होते. येथेही असाच वीर मुद्रेतील गदाधारी मारुतीराया कालनेमी राक्षसाच्या मस्तकी पाय ठेवून उभा असलेला दिसतो. आताच्या सुवर्णदुर्गावरील ही एकमेव देवता असावी. कारण, किल्ल्यात याशिवाय दुसरे मंदिर अस्तित्वात नाही अथवा ते काळाच्या ओघात नष्ट झाल्याची शक्यता आहे.

सुवर्णदुर्गच्या ऐतिहासिक घटना

  • सरखेल आंग्रे घराण्याचा सुवर्णदुर्ग मुख्य ठाणे होता. सन १७५० नंतर मराठा साम्राज्यात, पेशवे-तुळाजी आंग्रे संघर्ष टोकास पोहोचला. तुळाजीचे मुख्य सागरी शत्रू असणाऱ्या इंग्रजांशी तह करून, नानासाहेब पेशव्यांनी सन १७५५ मध्ये तुळाजीच्या प्रदेशावर आक्रमण केले. इंग्रज सेनानी कमोदर जेम्सने समुद्रातून व पेशव्याचा सरदार रामजी बिवलकर याने जमिनीमार्गे सुवर्णदुर्गवर हल्ला केला. या संदर्भात, ‘जंजिरे सुवर्णदुर्ग येथे सरकारची मोर्चेबंदी झाली होती. गोवा, फत्तेगड, कनकदुर्ग या तिही स्थळास निशाण चढोण, सुवर्णदुर्गात निशाण चढवावयासी नेले होते.’ असे एप्रिल १७५५ मध्ये त्रिंबक विनायक याने पेशव्यास कळविले.
  • इंग्रजांच्या जहाजांनी सुवर्णदुर्गास चहूबाजूने वेढा दिला, त्यांच्या जबरदस्त तोफा-बंदुकाच्या माऱ्याने किल्ला हादरून गेला. ११ एप्रिल १७५५ रोजी इंग्रजी सैन्याने सुवर्णदुर्गचा भक्कम दरवाजा, कुऱ्हाडीने घाव घालून फोडला आणि पेशव्यांचे निशाण किल्ल्यास लागले. यानंतर मराठी आरमाराचे प्रमुख झालेल्या धुळपांनी सुवर्णदुर्ग लढाऊ बनवला.
  • सन १७७४ साली कोकणात इंग्रज-मराठे युद्धाचे ढग जमू लागले. तेव्हा सुवर्णदुर्गचा किल्लेदार लखमोजी खानविलकरने, ‘यैसियासी जंजिरे सुवर्णदुर्गी चौकी, पहारा, अलंग नोबत बहुत सावधतेने करीत आहो. लढाईचे बच्चावाचे तरतूदही आज्ञेप्रमाणे व दर्यात गलबताचे छबिने (गस्त) येस करितो. जंजिराचे पश्चिमेकडील इमारतीचे काम तडक चालिले आहे.’ असे पत्र पेशव्यांना लिहिले.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज