शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोकण रेल्वेत महिलेचा संशयास्पद मृत्यू, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 12:17 IST

रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावरील सावंतवाडी दिवा पॅसेंजरमध्ये लांजातील एका प्रवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२३ मार्च) दुपारी येथे घडली. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला असून, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही.सावंतवाडी दिवा पॅसेंजर रेल्वेगाडीने मुंबईकडे ही महिला जात होती. प्रवासात संगमेश्वरदरम्यान अचानक तिच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर चिपळूणजवळ येताच अतिवेदना होऊ लागल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या आरोग्य यंत्रणेला सांगण्यात आले. चिपळूण रेल्वेस्थानकात गाडी पोहोचताच आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केली. मात्र, त्या महिलेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून काही रेल्वे प्रवाशांनी गोंधळ घालत रेल्वेच्या आरोग्य यंत्रणेवर आक्षेप घेतला. याचवेळी तेथे रेल्वेचे डॉ. शिरीष मदार पोहाेचले. त्यांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला आहे. मात्र, महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित महिलेचा आधीच मृत्यू झाला होता. परंतु, मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. या घटनेवेळी प्रवाशांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य न करता विनाकारण गोंधळ घातला. एवढेच नव्हे, तर रेल्वे पोलिसांनी बोलावलेली रुग्णवाहिका एका प्रवाशाने फोन लावून रद्द केली. -डाॅ. शिरीष मदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेDeathमृत्यू