शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बदल्यांना स्थगिती; शिक्षकांना दिलासा

By admin | Updated: May 14, 2016 00:02 IST

शिक्षकांचे समुपदेशन न करण्याचा निर्णय

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४७७ मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्याशिवाय शिक्षकांचे समुपदेशन न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षक बदल्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटना व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाने बदलीच्या रडारवर असलेल्या २२५ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शंभरपेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर मुख्याध्यापक नियुक्तीसाठी प्रयत्न करतानाच १५ दिवसांमध्ये शिक्षणमंत्र्यांसमवेत जिल्हा परिषद पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले आहे. यावेळी आमदांरासह शिक्षण सभापती विलास चाळके, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. संचमान्यता अपूर्ण असल्याने सहा महिन्यांनी पुन्हा बदल्यांची प्रक्रिया राबवावी लागणार आहे, असा मुद्दा शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. संचमान्यता पूर्ण होईपर्यंत समायोजन आणि बदल्या करु नयेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली. संचमान्यतेनंतर मुख्याध्यापकांचे पदावनत करण्यात येऊन ते उपशिक्षक होणार आहेत. यामुळे बदल्यांची प्रक्रिया होऊन सेवा निवृत्तीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना अन्य तालुक्यात जाणे त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे संचमान्यता पूर्ण होईपर्यंत समायोजन आणि समुपदेशन घेऊन बदल्या न करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला. मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यास शिक्षकांच्या बदल्यांची संख्या कमी होऊन जवळपास ती १०० होणार आहे. त्यामुळे समुपदेशनाला मिळालेल्या स्थगितीमुळे अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. (शहर वार्ताहर)