शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

चिपळुणात पुन्हा गोवंश हत्या झाल्याचा संशय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:38 IST

खेड तालुक्यातील लोटे व चिपळूण तालुक्यातील कामथे येथील गोवंश हत्येचा तपास सुरू असतानाच पाच दिवसातच पिंपळी येथे कापलेल्या जनावरांचे अवशेष सापडल्याने तालुक्यात पुन्हा गोवंश हत्याचा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचानामा केला असून, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नमुने घेतले आहेत.

ठळक मुद्दे पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा, साहित्य जप्तपशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी घेतले नमुने

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे व चिपळूण तालुक्यातील कामथे येथील गोवंश हत्येचा तपास सुरू असतानाच पाच दिवसातच पिंपळी येथे कापलेल्या जनावरांचे अवशेष सापडल्याने तालुक्यात पुन्हा गोवंश हत्याचा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचानामा केला असून, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नमुने घेतले आहेत.गतवर्षी २६ जानेवारी रोजी खेड - लोटे येथे अशीच घटना घडली होती. या घटनेला वर्ष पूर्ण होत असतानाच चिपळूण तालुक्यातील कामथे - हरेकरवाडी स्टॉपजवळ पाच दिवसांपूर्वी गोवंश हत्या झाल्याची घटना घडली होती. ज्याठिकाणी हत्या झाली त्याठिकाणी बाजूलाच पावट्याची शेती असून, शेतकरी रवींद्र उदेग हे शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली.ही घटना समजताच याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी (२१ जानेवारी) सकाळी चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे कापलेल्या जनावरांचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याठिकाणी कापलेल्या जनावरांच्या अवशेषाबरोबरच रक्ताचा सडाही पडलेला होता. घटनास्थळावरून पोलिसांना एक दोरखंड सापडला असून, हा दोरखंड जप्त करण्यात आला आहे.लोटे, कामथे येथील घटनेनंतर पिंपळी येथे जनावरांचे अवशेष सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, चिपळूण पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी