शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांचेही सर्वेक्षण होणार - मंत्री उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:11 IST

राज ठाकरे यांच्यावर टीका

रत्नागिरी : जिल्ह्यातील वादळामुळे झालेले भातशेती, नाचणी पिकांसह मच्छीमारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेती, तसेच मच्छीमारांची जाळी, नौका यांचेही सर्वेक्षण करण्यात येऊन त्यांना शासनाकडून नुकसानासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेला कर्जमाफी व नुकसानभरपाईचा निर्णय हा बळीराजासाठी दिलासा देणारा आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर नुकसानाची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, मच्छीमारांची जाळी, नौका, सुकवलेले मासे यांचे सर्वेक्षण करण्याबाबत मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. त्यांना मच्छीमारांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्यासह खासदार नारायण राणेही महायुतीसाठी आग्रही आहेत. महायुती म्हणूनच निवडणुका लढवाव्यात, अशी आमची आग्रही भूमिका असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्यावर टीका

ज्या काँग्रेसने शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या महाविकास आघाडीबरोबर मनसे अध्यक्ष जात आहेत, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा, तसेच राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला, त्या महाविकास आघाडीबरोबर जाताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किल्ल्याचा इतिहास काय आहे, हे व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.नमो उपक्रम कशासाठी?नमो उद्यानाबाबत राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली जात आहे. जागतिक वारसा स्थळे ज्या किल्ल्यांना दर्जा लाभला आहे, अशा किल्ल्यांमध्ये चांगल्या प्रकारची यंत्रणा उभी राहिली पाहिजे आणि पर्यटकांना त्या किल्ल्याच्या परिसराची माहिती मिळाली पाहिजे, त्यासाठीच हा नमो उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदार याद्यांबद्दल जी चर्चा चालली आहे, ती फेक नरेटिव्ह आहे. त्यामुळे त्यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Farmers, Fishermen to be Surveyed for Losses, Says Minister Samant

Web Summary : Minister Uday Samant announced surveys for Ratnagiri farmers and fishermen affected by the cyclone, promising financial aid. Loan waivers are coming soon. He criticized Raj Thackeray's alliance with Congress, defending the 'Namo' initiative for fort preservation and dismissed voter list concerns as false narratives.