शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांचेही सर्वेक्षण होणार - मंत्री उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:11 IST

राज ठाकरे यांच्यावर टीका

रत्नागिरी : जिल्ह्यातील वादळामुळे झालेले भातशेती, नाचणी पिकांसह मच्छीमारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेती, तसेच मच्छीमारांची जाळी, नौका यांचेही सर्वेक्षण करण्यात येऊन त्यांना शासनाकडून नुकसानासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेला कर्जमाफी व नुकसानभरपाईचा निर्णय हा बळीराजासाठी दिलासा देणारा आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर नुकसानाची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, मच्छीमारांची जाळी, नौका, सुकवलेले मासे यांचे सर्वेक्षण करण्याबाबत मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. त्यांना मच्छीमारांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्यासह खासदार नारायण राणेही महायुतीसाठी आग्रही आहेत. महायुती म्हणूनच निवडणुका लढवाव्यात, अशी आमची आग्रही भूमिका असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्यावर टीका

ज्या काँग्रेसने शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या महाविकास आघाडीबरोबर मनसे अध्यक्ष जात आहेत, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा, तसेच राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला, त्या महाविकास आघाडीबरोबर जाताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किल्ल्याचा इतिहास काय आहे, हे व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.नमो उपक्रम कशासाठी?नमो उद्यानाबाबत राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली जात आहे. जागतिक वारसा स्थळे ज्या किल्ल्यांना दर्जा लाभला आहे, अशा किल्ल्यांमध्ये चांगल्या प्रकारची यंत्रणा उभी राहिली पाहिजे आणि पर्यटकांना त्या किल्ल्याच्या परिसराची माहिती मिळाली पाहिजे, त्यासाठीच हा नमो उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदार याद्यांबद्दल जी चर्चा चालली आहे, ती फेक नरेटिव्ह आहे. त्यामुळे त्यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Farmers, Fishermen to be Surveyed for Losses, Says Minister Samant

Web Summary : Minister Uday Samant announced surveys for Ratnagiri farmers and fishermen affected by the cyclone, promising financial aid. Loan waivers are coming soon. He criticized Raj Thackeray's alliance with Congress, defending the 'Namo' initiative for fort preservation and dismissed voter list concerns as false narratives.