शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रत्नागिरीत व्यावसायिकाची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:40 IST

Suicide Ratnagiri- रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत शांतीलाल पटेल यांनी गुरुवारी पहाटे इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेने त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देमॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेने पाहिला मृतदेह आत्महत्येच्या घटनेनंतर एकच खळबळ

रत्नागिरी : रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत शांतीलाल पटेल यांनी गुरुवारी पहाटे इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेने त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली.शहरातील माळनाका येथील तारा ऑर्किड येथे चंद्रकांत पटेल वास्तव्याला होते. दोन महिन्यांपूर्वी लॉकडॉऊन उठल्यानंतर ते आपल्या मूळ गावाला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर त्यांनी यशस्वी मातही केली होती. दोन महिने ते घरीच होते. एक दिवसापूर्वी ते आपल्या वडिलांसह रत्नागिरीत परतले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमाराला त्यांनी आपल्या फ्लॅटला बाहेरून कडी लावली आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.सकाळी साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेला त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.पटेल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. २ ते ३ इमारती त्यांनी स्वतः उभ्या केल्या असून, रत्नागिरीत त्यांचे स्वतःच्या मालकीचे ३ ते ४ फ्लॅट आहेत. असे असताना गावातून परतल्यानंतर अचानक त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस