शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

समुद्रातील खडकावर बसलेले, अचानक भरतीचे पाणी वाढले; अजस्र लाटा पाहून दोघांना डोळ्यांसमोर मृत्यू दिसला, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:12 IST

रत्नागिरी : समुद्रातील खडकावर बसलेले असताना अचानक भरतीचे पाणी वाढल्याने दाेघे समुद्रातच अडकल्याची घटना रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे मंगळवारी ...

रत्नागिरी : समुद्रातील खडकावर बसलेले असताना अचानक भरतीचे पाणी वाढल्याने दाेघे समुद्रातच अडकल्याची घटना रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे मंगळवारी सायंकाळी घडली. समुद्राच्या अजस्र लाटांचे थैमान डाेळ्यांसमाेर पाहून दाेघांनाही साक्षात मृत्यूच समाेर दिसत हाेता. अखेर पाेलिसांकडे मदतीचा फाेन करताच, पाेलिसांनी स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करून दाेघांना सुखरूपपणे बाहेर काढले.रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉइंटच्या खालच्या बाजूला मंगळवारी सायंकाळी एक युवक आणि युवती गेले हाेते. तेथील एका खडकावर बसून दाेघे समुद्रातील पाण्याचा आनंद घेत हाेते. त्याचदरम्यान समुद्राला भरती आली आणि समुद्राचे पाणी वाढले. ते दाेघे ज्या ठिकाणी बसले हाेते, त्याच्या चहूबाजूला भरतीच्या पाण्याने वेढा घातला. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या. या अजस्र लाटा खडकावरही आदळू लागल्याने दाेघे घाबरून गेले. समुद्राचे पाणी अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आणि दाेघांना समाेर साक्षात आपला मृत्यूच दिसू लागला.जीवघेण्या प्रसंगात काय करावे, याचा विचार करीत असताना अखेर युवकाने शहर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर, शहर पाेलिस स्थानकातील अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अजस्र लाटांमध्ये या दाेघांना वाचविण्यात अडचणी येत होत्या. त्याच वेळी तिथे मासेमारी करणारे बुरहान मजगावकर आणि सुभान बुड्ये हे दाेघे तरुण देवदूत बनून आले. जिवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाेघांना सुखरूपपणे बाहेर काढले. जिवाची सुटका होताच, त्या दाेघांनी तरुणांचे पाय धरत त्यांचे आभार मानले.

दोघेही शिक्षणासाठी रत्नागिरीतमृत्यूच्या दाढेत अडकलेला युवक अमरावती येथील असून, युवती जळगाव येथे राहणारी आहे. हे दाेघेही रत्नागिरीत शिक्षणासाठी आले असून, रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहेत. या घटनेनंतर दाेघेही घाबरून गेले हाेते. या दाेघांना पाेलिसांच्या मदतीने सुखरूपपणे घरी साेडण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी