शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

चिपळूण पूर प्रकरणी अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 22:56 IST

चिपळुणमध्ये २२ जुलै रोजी वाशिष्ठी नदा आलेल्या महापूरामुळे होत्याचे नव्हते झाले.

चिपळूण : यंदा जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे कोकणातील चिपळूण येथील नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर आणि गावं पाण्याखाली गेली. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत पार पडलेल्या बैठकीदरम्यानचा अहवाल आणि भविष्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून त्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या त्याची माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले.

चिपळुणमध्ये २२ जुलै रोजी वाशिष्ठी नदा आलेल्या महापूरामुळे होत्याचे नव्हते झाले. नागरिक, व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास चौदा जणांचा बळी गेला. चिपळुणात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कऱणारी जनहित याचिका चिपळूण रहिवाशी आणि अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यावर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

३ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठक पार पडलेल्या बैठकीत नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत उभारण्याबाबतच्या मुद्दांवर सेंट्रल वॉटर पॉवर पुणे या संस्थेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच कोकण विभागात दरवर्षी पूराची समस्या का निर्माण होते. त्याबाबत संशोधन करून त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असून अहवालात विविध उपाय सुचविण्यात आले असल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने अॅड. रीना साळुंखे यांनी खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत राज्य सरकारला सोमवारपर्यंत सदर अहवाल न्यायालयात सादर कऱण्याचे निर्देश देत सुनावणी २० डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार