शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

चिपळूण पूर प्रकरणी अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 22:56 IST

चिपळुणमध्ये २२ जुलै रोजी वाशिष्ठी नदा आलेल्या महापूरामुळे होत्याचे नव्हते झाले.

चिपळूण : यंदा जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे कोकणातील चिपळूण येथील नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर आणि गावं पाण्याखाली गेली. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत पार पडलेल्या बैठकीदरम्यानचा अहवाल आणि भविष्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून त्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या त्याची माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले.

चिपळुणमध्ये २२ जुलै रोजी वाशिष्ठी नदा आलेल्या महापूरामुळे होत्याचे नव्हते झाले. नागरिक, व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास चौदा जणांचा बळी गेला. चिपळुणात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कऱणारी जनहित याचिका चिपळूण रहिवाशी आणि अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यावर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

३ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठक पार पडलेल्या बैठकीत नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत उभारण्याबाबतच्या मुद्दांवर सेंट्रल वॉटर पॉवर पुणे या संस्थेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच कोकण विभागात दरवर्षी पूराची समस्या का निर्माण होते. त्याबाबत संशोधन करून त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असून अहवालात विविध उपाय सुचविण्यात आले असल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने अॅड. रीना साळुंखे यांनी खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत राज्य सरकारला सोमवारपर्यंत सदर अहवाल न्यायालयात सादर कऱण्याचे निर्देश देत सुनावणी २० डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार