शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

नववीच्या नापास विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा--: शिक्षण विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:15 AM

दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच  परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते

ठळक मुद्देनववीच्या निकालाकडे केले लक्ष केंद्रीत, अंमलबजावणीचे आदेश

रत्नागिरी : दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच  परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते किंवा अभ्यासात मागे पडणाºया विद्यार्थ्यांना नापास करण्यात येते. शिक्षण विभागाने नववीच्या निकालाकडे लक्ष केंद्रीत करून नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची सूचना केली आहे.

आतापर्यंत  नववीच्या निकालाची माहिती शिक्षण विभागाकडून घेण्यात येत नव्हती. मात्र, यापुढे माहिती घेतली जाणार आहे. शासनाने विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण ठरविले होते, या धोरणात बदल केलेला नाही. त्यामुळे अभ्यासात कमी प्रगती असणाºया विद्यार्थ्यांवर नववीत गेल्यानंतर नापास होण्याचा कठीण प्रसंग ओढवतो..

अभ्यासात फारशी प्रगती नसलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याकडे शाळाचा कल अधिक असतो.  इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा व शाळा निकालाबाबत सर्वाेच्च शिखरावर असावी, याकरिता इयत्ता नववीमध्ये अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना नापास केले जाते. अनेक शाळांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त प्रमाणात असतेच असते. आठवीपर्यंत पास व निकाल नाही. नापास होणाºया विद्यार्थ्यांना शाळा बदलण्याची सूचना केली जाते अथवा त्यांचा १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसविण्यात येत असते.

गतवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नववीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश वर्षभरापूर्वीच शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडून शाळांना बजावण्यात आले होते. मात्र, या आदेशाची शाळांकडून गांभीर्याने अंमलबजावणी न करता ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे कामकाज सुरू आहे. नापास विद्यार्थ्यांच्या  फेरपरीक्षा घेण्याबाबत शाळांना पुन्हा सूचना करण्यात आल्या असून, सूचनांची अंमलबजावणी शाळांनी प्राधान्याने करणे आवश्यक आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण