शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोकणात फुलू लागला स्ट्रॉबेरी शेतीचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:05 IST

दापोली : दापोली तालुक्यातील नानटे - बौद्धवाडीतील नीलेश तांबे या तरुणाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबापुरीत त्याला थोड्या

ठळक मुद्देनीलेश तांबे : मुंबईतील नोकरी सोडून नानटे गावात आधुनिक पध्दतीने केली शेतीची लागवड

शिवाजी गोरे। 

दापोली : दापोली तालुक्यातील नानटे - बौद्धवाडीतील नीलेश तांबे या तरुणाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबापुरीत त्याला थोड्या पगाराची नोकरीही मिळाली. अखेर मुंबई सोडून गावात येऊन आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याने कातळावर मातीचा भराव करून भात, नाचणी खरीप पीक घेतले. रब्बी हंगामात त्याने कलिंगड, स्ट्रॉबेरी, काकडी, मिरची, भोपळा ही पिके घेऊन पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

सुधारित बियाण्यांचा वापर करून आधुनिक पध्दतीने त्याने मोठ्या कष्टाने शेती केली. सेंद्रीय कलिंगड शेतीतून त्याला ३ लाख रुपयांचा नफा झाला असून, एका वर्षात तांबे कुटुंबीय अडीच एकर शेतीतून लखपती झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नानटे गावातील तरुण शेतकरी नीलेश तांबे या  शेतकºयाने आपल्या शेतीत स्ट्रॉबेरी पीक घेतले आहे. स्ट्रॉबेरी शेती फक्त थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर भागातच आपल्याला पाहायला मिळते. याठिकाणी ही शेती चांगल्या पध्दतीने होते, असा लोकांचा समज आहे. परंतु अलिकडे कोकणातही स्ट्रॉबेरी शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते, हे कोकणातील अनेक शेतकºयांनी सिद्ध केले आहे.

नीलेश तांबे या शेतकºयाने आपल्या गावाकडील वडिलोपार्जित जमिनीत शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कोकणातील तरुणवर्गाने मुंबईत जाऊन तूटपुंज्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावातच राहून शेती करण्याचा सल्ला त्याने दिला आहे. नीलेश एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शेती पूरक व्यवसाय म्हणून दोन गायी, दोन म्हशी, १० बकºया व ५० कोंबड्याही पाळल्या आहेत. 

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळणारी शाश्वत शेती करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तांबे या तरुण शेतकºयाला कृषी विभागाकडून सेंद्रीय खत, बियाणे, मल्चिंग पेपर, शेती अवजारे सबसिडीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. 

 

 

कोकणच्या लाल मातीतील स्ट्रॉबेरी अतिशय चांगली, गोड, गडद रंगाची आहे. टिकून राहण्याची क्षमता अधिक असल्याने लवकर खराब होत नाही, त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा कोकणातील स्ट्रॉबेरीची चव अधिक चांगली आहे.

- नीलेश तांबे, तरुण शेतकरी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी