शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात फुलू लागला स्ट्रॉबेरी शेतीचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:05 IST

दापोली : दापोली तालुक्यातील नानटे - बौद्धवाडीतील नीलेश तांबे या तरुणाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबापुरीत त्याला थोड्या

ठळक मुद्देनीलेश तांबे : मुंबईतील नोकरी सोडून नानटे गावात आधुनिक पध्दतीने केली शेतीची लागवड

शिवाजी गोरे। 

दापोली : दापोली तालुक्यातील नानटे - बौद्धवाडीतील नीलेश तांबे या तरुणाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबापुरीत त्याला थोड्या पगाराची नोकरीही मिळाली. अखेर मुंबई सोडून गावात येऊन आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याने कातळावर मातीचा भराव करून भात, नाचणी खरीप पीक घेतले. रब्बी हंगामात त्याने कलिंगड, स्ट्रॉबेरी, काकडी, मिरची, भोपळा ही पिके घेऊन पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

सुधारित बियाण्यांचा वापर करून आधुनिक पध्दतीने त्याने मोठ्या कष्टाने शेती केली. सेंद्रीय कलिंगड शेतीतून त्याला ३ लाख रुपयांचा नफा झाला असून, एका वर्षात तांबे कुटुंबीय अडीच एकर शेतीतून लखपती झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नानटे गावातील तरुण शेतकरी नीलेश तांबे या  शेतकºयाने आपल्या शेतीत स्ट्रॉबेरी पीक घेतले आहे. स्ट्रॉबेरी शेती फक्त थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर भागातच आपल्याला पाहायला मिळते. याठिकाणी ही शेती चांगल्या पध्दतीने होते, असा लोकांचा समज आहे. परंतु अलिकडे कोकणातही स्ट्रॉबेरी शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते, हे कोकणातील अनेक शेतकºयांनी सिद्ध केले आहे.

नीलेश तांबे या शेतकºयाने आपल्या गावाकडील वडिलोपार्जित जमिनीत शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कोकणातील तरुणवर्गाने मुंबईत जाऊन तूटपुंज्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावातच राहून शेती करण्याचा सल्ला त्याने दिला आहे. नीलेश एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शेती पूरक व्यवसाय म्हणून दोन गायी, दोन म्हशी, १० बकºया व ५० कोंबड्याही पाळल्या आहेत. 

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळणारी शाश्वत शेती करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तांबे या तरुण शेतकºयाला कृषी विभागाकडून सेंद्रीय खत, बियाणे, मल्चिंग पेपर, शेती अवजारे सबसिडीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. 

 

 

कोकणच्या लाल मातीतील स्ट्रॉबेरी अतिशय चांगली, गोड, गडद रंगाची आहे. टिकून राहण्याची क्षमता अधिक असल्याने लवकर खराब होत नाही, त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा कोकणातील स्ट्रॉबेरीची चव अधिक चांगली आहे.

- नीलेश तांबे, तरुण शेतकरी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी