शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

कोकणात फुलू लागला स्ट्रॉबेरी शेतीचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:05 IST

दापोली : दापोली तालुक्यातील नानटे - बौद्धवाडीतील नीलेश तांबे या तरुणाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबापुरीत त्याला थोड्या

ठळक मुद्देनीलेश तांबे : मुंबईतील नोकरी सोडून नानटे गावात आधुनिक पध्दतीने केली शेतीची लागवड

शिवाजी गोरे। 

दापोली : दापोली तालुक्यातील नानटे - बौद्धवाडीतील नीलेश तांबे या तरुणाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर गरिबीवर मात करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबापुरीत त्याला थोड्या पगाराची नोकरीही मिळाली. अखेर मुंबई सोडून गावात येऊन आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याने कातळावर मातीचा भराव करून भात, नाचणी खरीप पीक घेतले. रब्बी हंगामात त्याने कलिंगड, स्ट्रॉबेरी, काकडी, मिरची, भोपळा ही पिके घेऊन पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

सुधारित बियाण्यांचा वापर करून आधुनिक पध्दतीने त्याने मोठ्या कष्टाने शेती केली. सेंद्रीय कलिंगड शेतीतून त्याला ३ लाख रुपयांचा नफा झाला असून, एका वर्षात तांबे कुटुंबीय अडीच एकर शेतीतून लखपती झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नानटे गावातील तरुण शेतकरी नीलेश तांबे या  शेतकºयाने आपल्या शेतीत स्ट्रॉबेरी पीक घेतले आहे. स्ट्रॉबेरी शेती फक्त थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर भागातच आपल्याला पाहायला मिळते. याठिकाणी ही शेती चांगल्या पध्दतीने होते, असा लोकांचा समज आहे. परंतु अलिकडे कोकणातही स्ट्रॉबेरी शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते, हे कोकणातील अनेक शेतकºयांनी सिद्ध केले आहे.

नीलेश तांबे या शेतकºयाने आपल्या गावाकडील वडिलोपार्जित जमिनीत शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कोकणातील तरुणवर्गाने मुंबईत जाऊन तूटपुंज्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावातच राहून शेती करण्याचा सल्ला त्याने दिला आहे. नीलेश एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शेती पूरक व्यवसाय म्हणून दोन गायी, दोन म्हशी, १० बकºया व ५० कोंबड्याही पाळल्या आहेत. 

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळणारी शाश्वत शेती करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तांबे या तरुण शेतकºयाला कृषी विभागाकडून सेंद्रीय खत, बियाणे, मल्चिंग पेपर, शेती अवजारे सबसिडीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. 

 

 

कोकणच्या लाल मातीतील स्ट्रॉबेरी अतिशय चांगली, गोड, गडद रंगाची आहे. टिकून राहण्याची क्षमता अधिक असल्याने लवकर खराब होत नाही, त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा कोकणातील स्ट्रॉबेरीची चव अधिक चांगली आहे.

- नीलेश तांबे, तरुण शेतकरी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी