शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:23 IST

गेल्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असून, पाचल येथे युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पडझडमांडवी तसेच अन्य किनाऱ्यांवर जोरदार लाटा

रत्नागिरी : गेल्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असून, पाचल येथे युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.मान्सूनच्या पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे. मात्र, सोमवारपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे काही भागात वादळी वारे वाहू लागले आहेत. गेल्या २४ तासात राजापूरवगळता इतर तालुक्यात पाऊस झाला नसला तरी या वाऱ्यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

राजापूर तालुक्यात ३५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. १ ते ११ जून या कालावधीत जिल्ह्यात केवळ ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. राजापूर तालुक्यातील पाचल येथील शशी लक्ष्मण खेडेकर हा २४ वर्षीय तरूण पोहण्यासाठी अर्जुना धरणामध्ये गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.

रत्नागिरी शहरातील जिल्हा न्यायालयानजीक मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक एलआयसी कार्यालयमार्गे वळवण्यात आली होती. हे झाड बऱ्याच वेळाने बाजूला करण्यात आले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात झालेल्या नुकसानाच्या प्राथमिक अहवालानुसार, वादळी वाऱ्यामुळे खेड तालुक्यातील वावेतर्फ नातू येथे चार घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

यात सावित्री कदम यांचे १८२० रूपये, पार्वती डांगे यांचे ५९१५ रूपये, सरस्वती भांबड यांचे ९५४० रूपये तसेच मारूती डांगे यांचे २५८० रूपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात वेहळे येथील तीन घरांचे अंशत: नुकसान झाले असून, मानसिंग राजेशिर्के यांचे ९००० रूपयांचे, सुरेश सिंगे यांचे ८७५० रूपयांचे, तर गोपाळ भोजने यांचे ९००० रूपयांचे नुकसान झाले आहे.पावसाच्या सरीमंगळवारीही काही ठिकाणी दुपारनंतर पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. अधूनमधून जोराचा वारा सुरू होता. रत्नागिरीतील मांडवी तसेच अन्य किनाऱ्यांवर दुपारी जोरदार लाटा उसळत होत्या. वादळी वारेही वाहात होते.

टॅग्स :environmentवातावरणRatnagiriरत्नागिरीRainपाऊस