शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:23 IST

गेल्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असून, पाचल येथे युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पडझडमांडवी तसेच अन्य किनाऱ्यांवर जोरदार लाटा

रत्नागिरी : गेल्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असून, पाचल येथे युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.मान्सूनच्या पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे. मात्र, सोमवारपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे काही भागात वादळी वारे वाहू लागले आहेत. गेल्या २४ तासात राजापूरवगळता इतर तालुक्यात पाऊस झाला नसला तरी या वाऱ्यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

राजापूर तालुक्यात ३५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. १ ते ११ जून या कालावधीत जिल्ह्यात केवळ ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. राजापूर तालुक्यातील पाचल येथील शशी लक्ष्मण खेडेकर हा २४ वर्षीय तरूण पोहण्यासाठी अर्जुना धरणामध्ये गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.

रत्नागिरी शहरातील जिल्हा न्यायालयानजीक मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक एलआयसी कार्यालयमार्गे वळवण्यात आली होती. हे झाड बऱ्याच वेळाने बाजूला करण्यात आले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात झालेल्या नुकसानाच्या प्राथमिक अहवालानुसार, वादळी वाऱ्यामुळे खेड तालुक्यातील वावेतर्फ नातू येथे चार घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

यात सावित्री कदम यांचे १८२० रूपये, पार्वती डांगे यांचे ५९१५ रूपये, सरस्वती भांबड यांचे ९५४० रूपये तसेच मारूती डांगे यांचे २५८० रूपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात वेहळे येथील तीन घरांचे अंशत: नुकसान झाले असून, मानसिंग राजेशिर्के यांचे ९००० रूपयांचे, सुरेश सिंगे यांचे ८७५० रूपयांचे, तर गोपाळ भोजने यांचे ९००० रूपयांचे नुकसान झाले आहे.पावसाच्या सरीमंगळवारीही काही ठिकाणी दुपारनंतर पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. अधूनमधून जोराचा वारा सुरू होता. रत्नागिरीतील मांडवी तसेच अन्य किनाऱ्यांवर दुपारी जोरदार लाटा उसळत होत्या. वादळी वारेही वाहात होते.

टॅग्स :environmentवातावरणRatnagiriरत्नागिरीRainपाऊस