शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

वादळं वाळूची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST

या ग्लोबल वणव्यात शहाणी माणसं अलिप्त होत आहेत. कारण ती ज्ञानी आहेत. एक वर्ग असा आहे की, नोकरी चाकरीतला ...

या ग्लोबल वणव्यात शहाणी माणसं अलिप्त होत आहेत. कारण ती ज्ञानी आहेत. एक वर्ग असा आहे की, नोकरी चाकरीतला राखलेला पैसा असला, तरी त्या वर्गाकडे समाजभानही आहे. हा वर्ग अतिश्रीमंत नाही व कंगालही नाही. मात्र, त्याची मदत गरज लोकांना विविध प्रकारे मिळत असते. आदिवासी मुलांसाठी कसलीही, प्रसिद्धीचीसुद्धा अपेक्षा न ठेवता हिवाळ्यात ब्लँकेट‌्स भेट देणारा बँकेतील एखादा निवृत्त अधिकारी मी पाहतो, तेव्हा समाधान वाटतं. ती व्यक्ती नास्तिक आहे; पण माणुसकीने प्रेरित आहे. तेवढं पुरेसं आहे. मानवता हाच आजचा धर्म आहे. कर्मकांड आम्ही करीतच नाही. उत्सवांवर तर मायबाप सरकारनेच निर्बंध आणलेले आहेत. निरीश्वरवादी तुम्ही कितीही झाकून ठेवले, तरी ते आपोआप मनातून उजळत असतात व प्रकाशही देत असतात. ज्ञानविज्ञान दीर्घकाळ पुरतं.

नास्तिकता चेपून, गाडून टाकणं ही लबाडीच आहे. शिक्षणही एकतर्फी, पारंपरिक आहे. त्यामुळेच ते माणसाला पुन्हा मागे मागे नेतं. माणसं, शिक्षक - प्राध्यापक असे रिव्हर्स होताना मी पाहतो. तेव्हा नवल वाटतं!

माणसाने ज्ञानाला वाळूच्या कणांची उपमा दिली. ज्ञान मिळलं की, मनात अशी वादळं सुरू होतात. माझ्या आसपास जी माणसं इमारतीत राहातात, त्यांच्या मनात असे कोणतेही विचार नसतात. त्यातले बहुतेक लोक वृत्तपत्रसुद्धा वाचत नाहीत. बायकांना फक्त जेवणासाठी काय पदार्थ बनवायचे एवढीच चिंता असते. नंतर त्या गृहिणी काहीच करत नाहीत. जगात काय चाललं आहे तेही माहीत नसतं. कोकणातला हा कोरडा दुष्काळ स्थानिक साहित्यिकांनी कधी नीट मांडला नाही. शिक्षकांचं लिखाणही अगदी ‘प्राथमिक’ वाटतं. अस्तित्वाचं काही आकलन त्यांना शास्त्रीय पातळीवर झालेलं दिसत नाही. म्हणून ते कालबाह्य गोष्टीचं समर्थन, उदात्तीकरण आणि अनुकरणही करतात. अध्यापनातून तेच मांडतात.

शेवटी माणुसकी मानणारा बुद्धिप्रामाण्यवादच जिंकणार आहे. हे मला नक्की माहीत आहे. वर्षानुवर्षे सत्य मांडणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकाराला कोकणाने वाळत टाकल्यासारखी वागणूक जरी दिली, तरी आमचे विज्ञानवादी, पर्यावरणवादी विचार मानवजात वाचवताना मनावर घ्यावेच लागतील! तो काळ आता आलेला आहे हे नक्की! झपाट्याने अधोगती व ऱ्हास होत असताना इंटरनेटच्या आभासी, भ्रामक व्यसनात न रमता प्रत्यक्ष ‘हार्डवर्क’ करत घाम गाळावा लागेल. घामाच्या थेंबांचे मोती होतील. ज्या उद्योजकांनी अशी कडी मेहनत खडी केली तेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या स्पर्धेत टिकले. परदेशात जाऊन राहणंही गैर नाही. माय मराठी आपण तिकडेही प्रसारित करू शकतो. प्रचंड मोठं जग आता आपलं आहे. ‘इमान’ महत्त्वाचं!!

- माधव गवाणकर, दापोली