शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वादळं वाळूची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST

या ग्लोबल वणव्यात शहाणी माणसं अलिप्त होत आहेत. कारण ती ज्ञानी आहेत. एक वर्ग असा आहे की, नोकरी चाकरीतला ...

या ग्लोबल वणव्यात शहाणी माणसं अलिप्त होत आहेत. कारण ती ज्ञानी आहेत. एक वर्ग असा आहे की, नोकरी चाकरीतला राखलेला पैसा असला, तरी त्या वर्गाकडे समाजभानही आहे. हा वर्ग अतिश्रीमंत नाही व कंगालही नाही. मात्र, त्याची मदत गरज लोकांना विविध प्रकारे मिळत असते. आदिवासी मुलांसाठी कसलीही, प्रसिद्धीचीसुद्धा अपेक्षा न ठेवता हिवाळ्यात ब्लँकेट‌्स भेट देणारा बँकेतील एखादा निवृत्त अधिकारी मी पाहतो, तेव्हा समाधान वाटतं. ती व्यक्ती नास्तिक आहे; पण माणुसकीने प्रेरित आहे. तेवढं पुरेसं आहे. मानवता हाच आजचा धर्म आहे. कर्मकांड आम्ही करीतच नाही. उत्सवांवर तर मायबाप सरकारनेच निर्बंध आणलेले आहेत. निरीश्वरवादी तुम्ही कितीही झाकून ठेवले, तरी ते आपोआप मनातून उजळत असतात व प्रकाशही देत असतात. ज्ञानविज्ञान दीर्घकाळ पुरतं.

नास्तिकता चेपून, गाडून टाकणं ही लबाडीच आहे. शिक्षणही एकतर्फी, पारंपरिक आहे. त्यामुळेच ते माणसाला पुन्हा मागे मागे नेतं. माणसं, शिक्षक - प्राध्यापक असे रिव्हर्स होताना मी पाहतो. तेव्हा नवल वाटतं!

माणसाने ज्ञानाला वाळूच्या कणांची उपमा दिली. ज्ञान मिळलं की, मनात अशी वादळं सुरू होतात. माझ्या आसपास जी माणसं इमारतीत राहातात, त्यांच्या मनात असे कोणतेही विचार नसतात. त्यातले बहुतेक लोक वृत्तपत्रसुद्धा वाचत नाहीत. बायकांना फक्त जेवणासाठी काय पदार्थ बनवायचे एवढीच चिंता असते. नंतर त्या गृहिणी काहीच करत नाहीत. जगात काय चाललं आहे तेही माहीत नसतं. कोकणातला हा कोरडा दुष्काळ स्थानिक साहित्यिकांनी कधी नीट मांडला नाही. शिक्षकांचं लिखाणही अगदी ‘प्राथमिक’ वाटतं. अस्तित्वाचं काही आकलन त्यांना शास्त्रीय पातळीवर झालेलं दिसत नाही. म्हणून ते कालबाह्य गोष्टीचं समर्थन, उदात्तीकरण आणि अनुकरणही करतात. अध्यापनातून तेच मांडतात.

शेवटी माणुसकी मानणारा बुद्धिप्रामाण्यवादच जिंकणार आहे. हे मला नक्की माहीत आहे. वर्षानुवर्षे सत्य मांडणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकाराला कोकणाने वाळत टाकल्यासारखी वागणूक जरी दिली, तरी आमचे विज्ञानवादी, पर्यावरणवादी विचार मानवजात वाचवताना मनावर घ्यावेच लागतील! तो काळ आता आलेला आहे हे नक्की! झपाट्याने अधोगती व ऱ्हास होत असताना इंटरनेटच्या आभासी, भ्रामक व्यसनात न रमता प्रत्यक्ष ‘हार्डवर्क’ करत घाम गाळावा लागेल. घामाच्या थेंबांचे मोती होतील. ज्या उद्योजकांनी अशी कडी मेहनत खडी केली तेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या स्पर्धेत टिकले. परदेशात जाऊन राहणंही गैर नाही. माय मराठी आपण तिकडेही प्रसारित करू शकतो. प्रचंड मोठं जग आता आपलं आहे. ‘इमान’ महत्त्वाचं!!

- माधव गवाणकर, दापोली