शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वादळं वाळूची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST

या ग्लोबल वणव्यात शहाणी माणसं अलिप्त होत आहेत. कारण ती ज्ञानी आहेत. एक वर्ग असा आहे की, नोकरी चाकरीतला ...

या ग्लोबल वणव्यात शहाणी माणसं अलिप्त होत आहेत. कारण ती ज्ञानी आहेत. एक वर्ग असा आहे की, नोकरी चाकरीतला राखलेला पैसा असला, तरी त्या वर्गाकडे समाजभानही आहे. हा वर्ग अतिश्रीमंत नाही व कंगालही नाही. मात्र, त्याची मदत गरज लोकांना विविध प्रकारे मिळत असते. आदिवासी मुलांसाठी कसलीही, प्रसिद्धीचीसुद्धा अपेक्षा न ठेवता हिवाळ्यात ब्लँकेट‌्स भेट देणारा बँकेतील एखादा निवृत्त अधिकारी मी पाहतो, तेव्हा समाधान वाटतं. ती व्यक्ती नास्तिक आहे; पण माणुसकीने प्रेरित आहे. तेवढं पुरेसं आहे. मानवता हाच आजचा धर्म आहे. कर्मकांड आम्ही करीतच नाही. उत्सवांवर तर मायबाप सरकारनेच निर्बंध आणलेले आहेत. निरीश्वरवादी तुम्ही कितीही झाकून ठेवले, तरी ते आपोआप मनातून उजळत असतात व प्रकाशही देत असतात. ज्ञानविज्ञान दीर्घकाळ पुरतं.

नास्तिकता चेपून, गाडून टाकणं ही लबाडीच आहे. शिक्षणही एकतर्फी, पारंपरिक आहे. त्यामुळेच ते माणसाला पुन्हा मागे मागे नेतं. माणसं, शिक्षक - प्राध्यापक असे रिव्हर्स होताना मी पाहतो. तेव्हा नवल वाटतं!

माणसाने ज्ञानाला वाळूच्या कणांची उपमा दिली. ज्ञान मिळलं की, मनात अशी वादळं सुरू होतात. माझ्या आसपास जी माणसं इमारतीत राहातात, त्यांच्या मनात असे कोणतेही विचार नसतात. त्यातले बहुतेक लोक वृत्तपत्रसुद्धा वाचत नाहीत. बायकांना फक्त जेवणासाठी काय पदार्थ बनवायचे एवढीच चिंता असते. नंतर त्या गृहिणी काहीच करत नाहीत. जगात काय चाललं आहे तेही माहीत नसतं. कोकणातला हा कोरडा दुष्काळ स्थानिक साहित्यिकांनी कधी नीट मांडला नाही. शिक्षकांचं लिखाणही अगदी ‘प्राथमिक’ वाटतं. अस्तित्वाचं काही आकलन त्यांना शास्त्रीय पातळीवर झालेलं दिसत नाही. म्हणून ते कालबाह्य गोष्टीचं समर्थन, उदात्तीकरण आणि अनुकरणही करतात. अध्यापनातून तेच मांडतात.

शेवटी माणुसकी मानणारा बुद्धिप्रामाण्यवादच जिंकणार आहे. हे मला नक्की माहीत आहे. वर्षानुवर्षे सत्य मांडणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकाराला कोकणाने वाळत टाकल्यासारखी वागणूक जरी दिली, तरी आमचे विज्ञानवादी, पर्यावरणवादी विचार मानवजात वाचवताना मनावर घ्यावेच लागतील! तो काळ आता आलेला आहे हे नक्की! झपाट्याने अधोगती व ऱ्हास होत असताना इंटरनेटच्या आभासी, भ्रामक व्यसनात न रमता प्रत्यक्ष ‘हार्डवर्क’ करत घाम गाळावा लागेल. घामाच्या थेंबांचे मोती होतील. ज्या उद्योजकांनी अशी कडी मेहनत खडी केली तेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या स्पर्धेत टिकले. परदेशात जाऊन राहणंही गैर नाही. माय मराठी आपण तिकडेही प्रसारित करू शकतो. प्रचंड मोठं जग आता आपलं आहे. ‘इमान’ महत्त्वाचं!!

- माधव गवाणकर, दापोली