शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण थांबवा, काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन

By शोभना कांबळे | Updated: April 24, 2023 18:13 IST

..तर खारघरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही

रत्नागिरी : प्रशासनाकडून लवकरच बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण थांबवावे, अशी मागणी काॅंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेद दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, राजापूर तालुक्यात उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन्हाळ्यात सर्वेक्षण सुरू केल्याने रिफायनरी विरोधी जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल त्यामुळे मोठा उद्रेक होऊ शकतो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर येथे सरकारच्या बेपर्वा वृत्ती व नियोजन शून्य आयोजनामुळे नागरिकांचा मृत्यू झाला. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणावेळी जनता माळरानावर एकवटल्यास खारघरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.स्थानिक जनतेचा बारसू रिफायनरीला असलेला विरोध लक्षात घेता, बारसू रिफायनरी सर्वेक्षणचे काम थांबवावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हे निवेदन देताना महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन, शहर अध्यक्ष रमेश शाहा, माजी तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सरचिटणीस आतिफ साखरकर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पcongressकाँग्रेस