शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला?, बळीराजाच्या जीवाला अधिकच घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:55 IST

rain, farmar, ratnagirinews ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणारा पावसाचा परतीचा प्रवास लांबला असून मुक्काम वाढू लागला आहे. हवामाना खात्याने पुन्हा २१ ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा मुक्काम वाढला? पिकाचे काय, बळीराजाच्या जीवाला अधिकच घोर

रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणारा पावसाचा परतीचा प्रवास लांबला असून मुक्काम वाढू लागला आहे. हवामाना खात्याने पुन्हा २१ ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा पंधरवडा संपला तरी पावसाचा मुक्काम वाढू लागला आहे.गेल्या आठवड्यात १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात चार दिवस मेघगर्जनेस, विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली होती. त्याचबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

यावेळी सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने भातशेती वेळेवर तयार झाली होती. त्यामुळे काहींनी भाताची कापणी करून घरी आणून पेंढ्या रचून ठेवल्या तर काहींचे पीक शेतातच उभे होते. या पावसाने उभे शेत आडवे केले तर रचून ठेवलेल्या भाताच्या पेंढ्याही पूर्णपणे भिजवून पिकाचे नुकसान केले. या संकटामुळे शेतकऱ्यांचे होते नव्हते ते पावसाने ओरबाडून नेले.गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थोडासा थांबला आहे. त्यामुळे बळीराजा आता कापलेले भात कसेबसे घरात घेण्याच्या घाईत असतानाच आता पुन्हा सोमवारपासून हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने २१ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आता बळीराजाच्या जीवाला पुन्हा घोर लागून राहिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी