शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
7
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
8
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
9
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
10
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
11
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
12
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
14
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
15
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
16
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
17
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
18
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
19
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
20
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला?, बळीराजाच्या जीवाला अधिकच घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:55 IST

rain, farmar, ratnagirinews ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणारा पावसाचा परतीचा प्रवास लांबला असून मुक्काम वाढू लागला आहे. हवामाना खात्याने पुन्हा २१ ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा मुक्काम वाढला? पिकाचे काय, बळीराजाच्या जीवाला अधिकच घोर

रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणारा पावसाचा परतीचा प्रवास लांबला असून मुक्काम वाढू लागला आहे. हवामाना खात्याने पुन्हा २१ ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा पंधरवडा संपला तरी पावसाचा मुक्काम वाढू लागला आहे.गेल्या आठवड्यात १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात चार दिवस मेघगर्जनेस, विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली होती. त्याचबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

यावेळी सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने भातशेती वेळेवर तयार झाली होती. त्यामुळे काहींनी भाताची कापणी करून घरी आणून पेंढ्या रचून ठेवल्या तर काहींचे पीक शेतातच उभे होते. या पावसाने उभे शेत आडवे केले तर रचून ठेवलेल्या भाताच्या पेंढ्याही पूर्णपणे भिजवून पिकाचे नुकसान केले. या संकटामुळे शेतकऱ्यांचे होते नव्हते ते पावसाने ओरबाडून नेले.गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थोडासा थांबला आहे. त्यामुळे बळीराजा आता कापलेले भात कसेबसे घरात घेण्याच्या घाईत असतानाच आता पुन्हा सोमवारपासून हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने २१ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आता बळीराजाच्या जीवाला पुन्हा घोर लागून राहिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी