शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चिपळूण नगर परिषदेचा अत्याधुनिक बायोमेट्रिक प्रकल्प प्रगतिपथावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:11 IST

कचरा वर्गीकरण, विघटन आणि रासायनिक प्रक्रिया करून व भविष्यात बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती करणारा हा कोकणातील मोठा प्रकल्प ठरणार आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत प्राप्त झालेल्या साडेतीन कोटी रुपये निधीमधून चिपळूण नगर परिषदेने येथील कचरा प्रकल्पावर अत्याधुनिक बायोमेट्रिक हाती घेतला असून, या महत्त्कांक्षी प्रकल्पाचे काम आता प्रगतिपथावर आले आहे. कचरा वर्गीकरण, विघटन आणि रासायनिक प्रक्रिया करून व भविष्यात बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती करणारा हा कोकणातील मोठा प्रकल्प ठरणार आहे.स्वच्छ भारत अभियानात भाग घेऊन चिपळूण नगर परिषदेने उत्तम कामासाठी शासनाचा पुरस्कारही मिळवला आहे. या अभियानात नगर परिषदेला ३ कोटी ४६ लाख ९५ हजार ६६८ इतका निधी शासनाकडून मिळाला होता. या निधीमधून चिपळूण परिषदेने १२ वाहने खरेदी केली होती. उर्वरित निधीमधून अत्याधुनिक असा बायोमेट्रिक व बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला व त्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथील डोंगरावर ६ एकर जमिनीत असलेल्या कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी हा अत्याधुनिक प्रकल्प उभारला जात असून बायोमेट्रिक प्रकल्पाची क्षमता २२ टन कँपोस्टिंगची असून बायोगॅस प्रकल्पाची क्षमता ५ टन कँपोस्टिंग इतकी असेल. ओला कचरा, सुका कचरा आणि प्लास्टिक असे वर्गीकरण करून त्याचे विघटन व त्यापासून बायोगॅस निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी ८२ लाख ७५ हजार ७४७ रकमेची अत्याधुनिक यंत्रसामग्री येथे आणण्यात आली असून दोन वेगवेगळ्या इमारतीही उभारण्यात आल्या आहेत.३० मार्च २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा असल्याने प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञ मंडळींसह मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे तसेच आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. १ मार्च २०२३ ला स्वच्छ भारत अभियान २ सुरू होणार असून त्या माध्यमातूनही नगर परिषदेने तयारी केली आहे. बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यावर वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे चिपळूण नगर परिषद प्रकल्पासाठी विजेबाबत स्वयंपूर्ण होणार आहे.नगर परिषदेने हाती घेतलेला हा प्रकल्प कोकणातील एक मोठा बायोमेट्रिक, बायोगॅस प्रकल्प ठरणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक ठेकेदारच या प्रकल्पाचे काम करत असून अत्याधुनिक यंत्रसामग्रीसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मदत घेतली जात आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावे, याकडे सर्व यंत्रणा लक्ष देऊन आहे आणि त्याचा वेळोवेळी आढावाही घेतला जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण