शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला देण्यास प्रारंभ, इतर दाखल्यांसाठी कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:24 IST

दाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विविध कामांसाठी दाखले आवश्यक असताना ते मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत.

ठळक मुद्देदाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याचे मान्य २ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरूच अन्य १८ प्रकारचे दाखले देणे बंद, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय

रत्नागिरी : दाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विविध कामांसाठी दाखले आवश्यक असताना ते मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याचे तलाठ्यांनी मान्य केले आहे. हे दाखले देण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, अन्य दाखल्यांअभावी ग्रामीण भागातील जनतेची कामे ठप्पच झाली आहेत.

राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील तलाठ्यांनी २ आॅक्टोबरपासून ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी, उत्पन्न, रहिवास, दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला, ना हरकत प्रमाणपत्र आदींसह अन्य १८ प्रकारचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

तहसीलदार कार्यालयाकडून रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले मिळण्यासाठी संबंधित तलाठ्याच्या दाखल्याची आवश्यकता भासते. मात्र, तलाठ्यांच्या राज्यस्तरीय संघटनेने दाखले न देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील तलाठ्यांनीही काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे.

अखेरीस महिनाभराच्या असहकारानंतर तलाठी संघटनेने नागरिकांची समस्या लक्षात घेत उत्पन्नाचा दाखला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला देण्यास सुरुवात झाली.

ग्रामीण जनतेमध्ये याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. मात्र, याचबरोबरीने अन्य दाखले देण्याचे काम कधी सुरु होणार, असा प्रश्नही आता उपस्थित करण्यात येत आहे.

तलाठी संघटनेकडून देण्यात येणारे दाखले विविध शासकीय योजनांसाठी, शैक्षणिक कामासाठी तसेच वैद्यकीय कामासाठी वापरली जातात. मात्र, जनतेला आवश्यक असणारे दाखलेच तलाठी संघटनेने देण्याचे बंद केले आहे.

अन्य दाखल्यांसाठी नागरिक तलाठ्यांकडे खेपा मारत असून, आंदोलनामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtalukaतालुका