शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला देण्यास प्रारंभ, इतर दाखल्यांसाठी कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:24 IST

दाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विविध कामांसाठी दाखले आवश्यक असताना ते मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत.

ठळक मुद्देदाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याचे मान्य २ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरूच अन्य १८ प्रकारचे दाखले देणे बंद, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय

रत्नागिरी : दाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विविध कामांसाठी दाखले आवश्यक असताना ते मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याचे तलाठ्यांनी मान्य केले आहे. हे दाखले देण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, अन्य दाखल्यांअभावी ग्रामीण भागातील जनतेची कामे ठप्पच झाली आहेत.

राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील तलाठ्यांनी २ आॅक्टोबरपासून ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी, उत्पन्न, रहिवास, दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला, ना हरकत प्रमाणपत्र आदींसह अन्य १८ प्रकारचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

तहसीलदार कार्यालयाकडून रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले मिळण्यासाठी संबंधित तलाठ्याच्या दाखल्याची आवश्यकता भासते. मात्र, तलाठ्यांच्या राज्यस्तरीय संघटनेने दाखले न देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील तलाठ्यांनीही काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे.

अखेरीस महिनाभराच्या असहकारानंतर तलाठी संघटनेने नागरिकांची समस्या लक्षात घेत उत्पन्नाचा दाखला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला देण्यास सुरुवात झाली.

ग्रामीण जनतेमध्ये याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. मात्र, याचबरोबरीने अन्य दाखले देण्याचे काम कधी सुरु होणार, असा प्रश्नही आता उपस्थित करण्यात येत आहे.

तलाठी संघटनेकडून देण्यात येणारे दाखले विविध शासकीय योजनांसाठी, शैक्षणिक कामासाठी तसेच वैद्यकीय कामासाठी वापरली जातात. मात्र, जनतेला आवश्यक असणारे दाखलेच तलाठी संघटनेने देण्याचे बंद केले आहे.

अन्य दाखल्यांसाठी नागरिक तलाठ्यांकडे खेपा मारत असून, आंदोलनामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtalukaतालुका