शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला देण्यास प्रारंभ, इतर दाखल्यांसाठी कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:24 IST

दाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विविध कामांसाठी दाखले आवश्यक असताना ते मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत.

ठळक मुद्देदाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याचे मान्य २ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरूच अन्य १८ प्रकारचे दाखले देणे बंद, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय

रत्नागिरी : दाखले देण्याचा अधिकार नसल्याने तलाठ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. विविध कामांसाठी दाखले आवश्यक असताना ते मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याचे तलाठ्यांनी मान्य केले आहे. हे दाखले देण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, अन्य दाखल्यांअभावी ग्रामीण भागातील जनतेची कामे ठप्पच झाली आहेत.

राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील तलाठ्यांनी २ आॅक्टोबरपासून ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी, उत्पन्न, रहिवास, दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला, ना हरकत प्रमाणपत्र आदींसह अन्य १८ प्रकारचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

तहसीलदार कार्यालयाकडून रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले मिळण्यासाठी संबंधित तलाठ्याच्या दाखल्याची आवश्यकता भासते. मात्र, तलाठ्यांच्या राज्यस्तरीय संघटनेने दाखले न देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील तलाठ्यांनीही काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे.

अखेरीस महिनाभराच्या असहकारानंतर तलाठी संघटनेने नागरिकांची समस्या लक्षात घेत उत्पन्नाचा दाखला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला देण्यास सुरुवात झाली.

ग्रामीण जनतेमध्ये याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. मात्र, याचबरोबरीने अन्य दाखले देण्याचे काम कधी सुरु होणार, असा प्रश्नही आता उपस्थित करण्यात येत आहे.

तलाठी संघटनेकडून देण्यात येणारे दाखले विविध शासकीय योजनांसाठी, शैक्षणिक कामासाठी तसेच वैद्यकीय कामासाठी वापरली जातात. मात्र, जनतेला आवश्यक असणारे दाखलेच तलाठी संघटनेने देण्याचे बंद केले आहे.

अन्य दाखल्यांसाठी नागरिक तलाठ्यांकडे खेपा मारत असून, आंदोलनामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtalukaतालुका