शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ST Strike : ..तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 12:17 PM

रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप तोडगा निघाला ...

रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नाही. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप आ. गोपीचंद पडळकर व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने  काल, शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेच्या केवळ फेऱ्या सुरू असून यावर तोडगा निघालेला नाही. परिणामी एसटी सेवा अजून देखील बंदच आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तर, दुसरीकडे खासगी वाहतूक तेजीत सुरु आहे.

दरम्यान, रत्नागिरी येथील आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांनी आज, रविवारी सकाळी जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन कामबंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

तर, सरकारकडून आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. दरम्यान शासनाने आंदोलनकर्त्यां कर्मचाऱ्यांवर राज्यात अनेक ठिकाणी निलंबनाची कारवाई देखली केली आहे. तरी देखील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. यातच काल, शनिवारी कोल्हापुरातील एका एसटी कर्मचाऱ्याचा निलंबनाच्या कारवाईच्या भितीने ह्दयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यावर कधी तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे.  

टॅग्स :ST Strikeएसटी संप