शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणची ‘लालपरी’ चार दिवसांनी पश्चिम महाराष्ट्रात, मराठा आंदोलनामुळे वाहतूक होती ठप्प

By संदीप बांद्रे | Updated: November 4, 2023 18:56 IST

आगाराचे लाखोंचे नुकसान

चिपळूण : मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवरून चिघळलेल्या आंदोलनामुळे चिपळूण आगारातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारी बस वाहतूक रद्द करण्यात आली होती. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी गुरूवारी उपोषण स्थगित केल्यानंतर ठिकठिकाणचे तणावपूर्ण वातावरण शांत झाले आहे. त्यामुळे रद्द केलेली बससेवा शुक्रवारपासून सुरळीत करण्यात आली आहे. वाहतूक सेवा सुरू झाल्याने तब्बल चार दिवसांनी चिपळुणातून पश्चिम महाराष्ट्रात लालपरी धावली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपाेषण सुरू हाेते. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनामुळे एसटीची तोडफोड, दगडफेक होऊन नुकसान होऊ नये यासाठी सोमवारपासून चिपळूण आगारातून सुटणाऱ्या अक्कलकोट, बीड, बेळगाव या मार्गावरच्या पाच फेऱ्या बंद केल्या होत्या. तर मंगळवारीही या फेऱ्यांबरोबरच पुणे, मिरज, सातारा, कराड, कवठेमहाकांळ, जत आदी १० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. चार दिवस या बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे २,८६० किलोमीटरचे मार्ग कमी झाले. परिणामी, चिपळूण आगाराला मोठा आर्थिक फटका बसला.

पोफळीच्या पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी बसेस बंद झाल्याने प्रवासीही खोळंबले. या मार्गावर प्रवास करणारे अनेक प्रवासी चिपळुणात अडकून होते. त्यांना खासगी वाहनांच्या आधारे प्रवास करावा लागला. शुक्रवारपासून या बंद असलेल्या सर्व फेऱ्या पूर्ववत करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणMaratha Reservationमराठा आरक्षण