शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

..म्हणून वीज तोडली, अधिकाऱ्यांच्या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:54 IST

अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावून गेले आणि त्यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तत्काळ वीज जाेडण्याचे आदेश दिले.

गणपतीपुळे : आंबा पीक शेती प्रकारात येत नसून हाॅर्टिकल्चर प्रकारात येते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार वीज ताेडल्याचे उत्तर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले. अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावून गेले आणि त्यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तत्काळ वीज जाेडण्याचे आदेश दिले.

गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथील अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गणपतीपुळे येथे आढावा बैठक आयाेजित केली हाेती. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आंबा बागायतदार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन ताेडल्याची माहिती मंत्री सामंत यांना कळताच त्यांनी सभेतच कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला. शासन निर्णय शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडायची नसतानाही ही वीज कनेक्शन का तोडण्यात आली? असा प्रश्न त्यांनी केला.या प्रश्नाला उत्तर देताना कार्यकारी अभियंता यांनी आंबा पीक हे शेती प्रकारात येत नसून ते हाॅर्टिकल्चर प्रकारात येते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ही वीज तोडल्याचे उत्तर दिले. त्यावर कोकणातील आंबा पीक हे शेती प्रकारात येत नाही हा जावईशोध कसा लावला? अशी विचारणा मंत्री सामंत यांनी केली.त्यानंतर त्यांनी तत्काळ राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी ऊर्जामंत्री राऊत यांनी तोडलेली वीज कनेक्शन आजच्या आज जोडून देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांना दिले. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत स्वतःचे विचार अंमलात न आणता शासनाची भूमिका बजवावी, अशी समजही दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीजUday Samantउदय सामंत