शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरीत तस्करी करणारी बोट जप्त, १६ जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 17:47 IST

प्राण्यांची तस्करी करून गुजरातकडे नेण्यात येत हाेते

रत्नागिरी : शेळ्या, मेंढ्यांची तस्करी करणाऱ्या बाेटीवर बाणकाेट (ता. मंडणगड) किनारपट्टीपासून ७५ नाॅटिकल मैल अंतरावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून शुक्रवारी (२१ एप्रिल) राेजी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. या बाेटीत ४ हजार शेळ्या मेंढ्या आढळल्या असून, याप्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली. ही बाेट सिंधुदुर्गातून गुजरातकडे जात हाेती.शेळ्या, मेंढ्यांनी भरलेली बाेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग जेट्टीवरून गुरुवारी सकाळी निघणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली हाेती. त्यानुसार सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाेटीचा पाठलाग सुरू केला. मात्र, पाच तासानंतर ही बाेट संपर्क कक्षेच्या बाहेर गेली. त्यानंतर अन्य एजन्सींना याबाबत माहिती देऊन बाेटीचा शाेध सुरू करण्यात आला. त्यानंतर ही बाेटी बाणकाेटी किनारपट्टीपासून ७५ नाॅटिकल मैल अंतरावर पकडण्यात आली.या बाेटीची तपासणी केली असता बाेटीत ४ हजार शेळ्या, मेंढ्या हाेत्या. या प्राण्यांची तस्करी करून गुजरातकडे नेण्यात येत हाेते. तस्करांनी बोटीची नोंदणी क्रमांक प्लेट बदलली असण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त अमित नायक यांनी सांगितले की, ही बोटी जयगड (ता. रत्नागिरी) बंदरात आणण्यात आली आहे. बाेटीची योग्य चौकशी करण्यात येणार आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या सुरक्षित संगोपनासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी