शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

SSC Result2024: कोकण विभागात सिंधुदूर्ग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी

By मेहरून नाकाडे | Updated: May 27, 2024 16:02 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात झाली वाढ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. २७ मे) जाहीर झाला असून एकूण निकाल ९९.०१ टक्के लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात ०.९ टक्के इतकी वाढ झाली आहे.कोकण मंडळापाठोपाठ कोल्हापूर मंडळाचा ९७.४५ टक्के, तर पुणे मंडळाचा ९६.४४ टक्के इतका निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर मंडळाचा असून ९४.७३ टक्के इतका लागला आहे.रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून २६ हजार ७८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी २६ हजार ५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १३ हजार ७३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १३ हजार ५५१ विद्यार्थी पास झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.६६ टक्के लागला आहे. कोकणातून १३ हजार ४५ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी १२ हजार ९६६ विद्यार्थिनी पास झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.७३ टक्के अधिक आहे.

सिंधुदूर्गचा निकाल ९९.३५ टक्केसिंधुदूर्ग जिल्ह्यातून ८ हजार ७८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ८ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९९.३५ टक्के लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ४ हजार ५७६ मुलगे परीक्षेला बसले होते त्यापैकी ४ हजार ५३५ मुलगे पास झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.१० टक्के आहे. जिल्ह्यातून चार हजार २१२ मुली परीक्षेस बसल्या होत्या पैकी चार हजार १९६ मुली पास झाल्या असून उत्तीर्णत्तेचे प्रमाण ९९.६२ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.५२ टक्केने अधिक आहे.

रत्नागिरीचा निकाल ९८.८५ टक्केरत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार ९९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १७ हजार ७८६ विद्यार्थी पास झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.८५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ९१५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ९०१६ विद्यार्थी पास झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२८ टक्के लागला आहे. ८८३३ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या पैकी ८७७० विद्यार्थिनी पास झाल्या असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२८ टक्के लागला आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.७५ टक्केने अधिक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSSC Resultदहावीचा निकालsindhudurgसिंधुदुर्ग