शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

धक्कादायक! प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत; इटलीत कंपनीवर घातली गेलीय बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 23:09 IST

औद्योगिक वसाहतीमधील विशेषत: रासायनिक प्रकल्प असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषण ही गेल्या काही वर्षांतील गंभीर समस्या झाली आहे.

रत्नागिरी : इटलीमध्ये तब्बल साडेतीन लाख लोक राहणाऱ्या भागातील जलस्रोत बाधित केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या मिटेनी कंपनीची उपकरणे आणि कायमचे रसायन (फॉरएव्हर केमिकल) बनवण्याची प्रक्रिया आता लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीकडे आहे. पर्यावरणीयदृष्ट्या आणि त्यामुळे मानवी आरोग्यासाठी ही रसायने घातक असल्याने प्रदूषणाचे मोठे संकट भविष्यात लोटे आणि परिसरावर येण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, भारतीय पर्यावरण यंत्रणा याकडे अजूनही दुर्लक्ष करत आहेत.

औद्योगिक वसाहतीमधील विशेषत: रासायनिक प्रकल्प असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषण ही गेल्या काही वर्षांतील गंभीर समस्या झाली आहे. लाेटे औद्योगिक वसाहतीत गेल्या काही वर्षांत झालेले स्फोट आणि त्यात मृत आणि जखमी झालेले कामगार हा चिंतेचा विषय आहेच. मात्र, त्याहीपेक्षा परिसरातील जलप्रदूषण, हवेतील प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दुर्दैवाने याबाबत सातत्याने लक्ष देणारी, अभ्यास करणारी कोणतीही यंत्रणा नाही.

लोटे येथे गेल्या तीन-चार वर्षांत सुरू झालेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने इटलीतील ज्या कंपनीकडून उपकरणे घेतली आहेत, ती मिटेनी कंपनी इटलीतील विसेन्झा या शहरात होती. प्रदूषणाच्या कारणामुळे ती कंपनी बंद करण्यात आली आहे. २०१८ मध्येच ही कंपनी बंद झाली. त्या कंपनीच्या संचालकांवर खटला दाखल झाला. जूनमध्ये विसेन्झीच्या न्यायालयाने पर्यावरण प्रदूषण आणि इतर कारणांसाठी या कंपनीच्या संचालकांना आणि अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या कंपनीची सर्व उपकरणे आणि त्यातील प्रक्रिया भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीची उपकंपनी असलेल्या व्हिवा लाइफ सायन्सेसने लिलावात खरेदी केली आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने नुकतेच कायमचे रसायन बनवण्याचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात इटलीप्रमाणेच लोटे आणि परिसरातील अनेक गावांना जल प्रदूषणाचा धोका आहे.सांडपाण्यात रसायन

इटलीतील मिटेनी कंपनीच्या सांडपाण्यामध्ये कायमचे रसायन (पीएफएएस) मोठ्या प्रमाणात आढळले. या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित झाले. हे पाणी पिणाऱ्या लोकांच्या रक्तात कायमचे रसायन मिसळले आणि त्यामुळे त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यात मिटेनी कंपनीच्या कामगारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.

कायमचे रसायन म्हणजे काय?

पीएफएएस म्हणजे प्रति आणि पॉलिफ्लोरोआल्काइल पदार्थांचा मानवनिर्मित रसायनांचा मोठा गट. १९४० पासून विविध उत्पादने आणि औद्योगिक क्षेत्रात त्याचा वापर सुरू झाला. त्याला कायमचे रसायन असे म्हणतात, कारण ही रसायने सहजपणे विघटित होत नाहीत. त्यांचे अस्तित्व बराच काळ राहते. वातावरण आणि मानवी शरीरात ते खूप काळ विघटित न होता राहते आणि त्यामुळेच ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.

काय होतात आरोग्यावरील परिणाम

कायमचे रसायन हवेत आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहात असल्याने मूत्रपिंड व वृषण कर्करोगाचा धोका वाढतो. अशा रसायनांमुळे हार्मोनल समतोल बिघडून थायरॉईड, प्रजनन समस्या आणि मुलांची वाढ यावर परिणाम होऊ शकतो. यकृताच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. कोलेस्ट्राॅल आणि रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. अशी रसायने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करत असल्याने संसर्गाचाही धोका वाढतो.

धोका आता उशाशी

जल आणि अन्य प्रदूषणांचा धोका असलेली ही रसायने बनवण्याचा कारखाना आता लोटे येथे कार्यरत झाला आहे. भविष्यात तो या परिसरासाठी धोकादायक ठरू शकतो. इटलीमधील उदाहरण समोर असतानाही भारतीय पर्यावरण विभागाकडून अशा उत्पादनांबाबत गांभीर्य दाखवले जात नसल्याची टीका पर्यावरण तज्ज्ञांकडून अनेकदा केली जाते. मात्र, त्यानंतरही अशी उत्पादने घेण्यासाठी परवानगी दिली जाते. त्यामुळे इटलीतील धोका आता उशाशी आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Banned Italian factory's polluting chemical production now in Ratnagiri, Maharashtra.

Web Summary : A factory banned in Italy for water pollution is now operating in Ratnagiri's Lote, raising concerns about environmental and health hazards. The Lakshmi Organic company acquired equipment from the closed Italian firm, Mitene, known for producing harmful 'forever chemicals,' sparking fears of water contamination similar to Italy.