शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदल फळ पिकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:09 IST

लांबलेला पाऊस, हवामानातील सातत्यपूर्ण बदल आणि ह्यक्यारह्ण तसेच ह्यमाहाह्ण वादळ यामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. यावर्षीचा आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा होणार आहे. काजूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय वाल, कुळीथ, पावटा या पिकांची उत्पादकता घटली आहे. चिकूचा आकार कमी झाला असून, रातांब्याच्या झाडांना अद्याप फुलोरा आलेला नाही.

ठळक मुद्देवातावरणातील बदल फळ पिकांच्या मुळावरवादळांनी बिघडवले, ऋतूचक्रात झाले मोठे बदल

रत्नागिरी : लांबलेला पाऊस, हवामानातील सातत्यपूर्ण बदल आणि ह्यक्यारह्ण तसेच ह्यमाहाह्ण वादळ यामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. यावर्षीचा आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा होणार आहे. काजूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय वाल, कुळीथ, पावटा या पिकांची उत्पादकता घटली आहे. चिकूचा आकार कमी झाला असून, रातांब्याच्या झाडांना अद्याप फुलोरा आलेला नाही.रत्नागिरीबरोबर कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असणाऱ्या आंबा पिकाचा हंगाम बदलत्या हवामानामुळे उशिरा होणार आहे. जानेवारीपासून थंडी सुरू झाल्याने फुलोरा उशिरा सुरू झाला, शिवाय फळधारणेचे प्रमाणही कमी आहे. ऑगस्टमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी संरक्षण केल्याने आंबा बाजारात आला असला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

हवामानात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलामुळे कीड, बुरशी, थ्रीप्स, तुडतुडा, उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा अंदाज घेत फवारणी करावी लागत आहे. सध्या वाटाणा ते सुपारी आकाराची फळे असली तरी आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता आहे. शिवाय थंडीचे प्रमाण वाढले तर मात्र फळधारणेला धोका पोहोचू शकतो. बदलत्या हवामानामुळे आंबा पिकाची उत्पादकता घटू लागली आहे.लांबलेल्या पावसामुळे काजू कलमांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फांदीमर रोगाची लागण होऊन बागांचे नुकसान होऊ लागले आहे. याशिवाय नवीन पालवीवर मॉस्क्युटो व फुलकिडी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने नवीन पालवी वाळू लागली आहे. परिणामी यावर्षी काजूची उत्पादकता कमी असून, काजूबीच्या आकारावरही परिणाम झाला आहे.पावसाळ्यातील भात कापणीनंतर कुळीथ, पावटा व वाल लागवड केली जाते. यावर्षी पाऊसच लांबल्याने कुळीथ, पावटा लागवड उशिरा करण्यात आली. नदीकाठच्या गावात वाल, कुळीथ लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जमिनीतील ओलाव्यामुळे कुळीथ व पावट्याची रोपे तरारली आहेत. शाखा वाढल्या आहेत. परंतु उष्म्यामुळे पावट्याला फुले येत नसल्यामुळे शेंगा लागणे अशक्य आहे.

कुळीथही बहरला असला तरी त्यालाही शेंगा नाहीत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी वेळेत लागवड केली, त्यांच्याकडील कुळीथ व पावटा पीक मात्र चांगले आहे. पावट्याच्या पानांवर किडीचा प्रादुर्भाव होऊन पाने पिवळी पडत आहेत. शिवाय उष्णता वाढल्याने फुले येत नाहीत, त्यामुळे शेंगा धरू शकत नसल्याने काही गावांतील शेतकऱ्यांनी पावट्याची रोपे काढून गुरांना घातली आहेत.कोकणातील महत्वपूर्ण पिकाबरोबर चिकूचेही उत्पादन घेतले जात असले तरी याचे प्रमाण अल्प आहे. परंतु यावर्षी चिकूच्या उत्पादकतेवर परिणाम झाला असून, आकारही कमी झाला आहे. निसर्गातील बदलाचा खूप मोठा परिणाम कोकणातील सर्वच पिकांच्या उत्पादकतेवर झाला आहे.

यावर्षी पाऊस लांबल्यामुळेच जिल्ह्यातील पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. आंबा, काजू, रातांब्याला फुलोरा उशिरा असल्याने नियोजित हंगामापेक्षा हंगाम उशिरा सुरू होणार हे निश्चित असले तरी कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावटा, कुळीथाची रोपे बहरली असली तरी त्यावर शेंगा नाहीत, पानावर किडीचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे यावर्षी कुळीथ, पावट्याची उत्पादकता घटली आहे. चिकूच्या आकारातही यावर्षी बदल झाला असून तो कमी झाला आहे.- चंद्रकांत खानविलकर,शेतकरी, उक्षी, ता. रत्नागिरी.

कोकणातील महत्वपूर्ण पीक म्हणजे कोकम. रातांब्याच्या फळांवर प्रक्रिया करून आमसुले, आगळ, सरबत, बियांपासून तेल तयार केले जाते. जानेवारीपासून रातांब्याच्या झाडाला फुलोरा येण्यास प्रारंभ होतो. मात्र, यावर्षी लांबलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला असल्याने अद्याप फुलोरा नाही. 

टॅग्स :fruitsफळेRatnagiriरत्नागिरी