शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वातावरणातील बदल फळ पिकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:09 IST

लांबलेला पाऊस, हवामानातील सातत्यपूर्ण बदल आणि ह्यक्यारह्ण तसेच ह्यमाहाह्ण वादळ यामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. यावर्षीचा आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा होणार आहे. काजूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय वाल, कुळीथ, पावटा या पिकांची उत्पादकता घटली आहे. चिकूचा आकार कमी झाला असून, रातांब्याच्या झाडांना अद्याप फुलोरा आलेला नाही.

ठळक मुद्देवातावरणातील बदल फळ पिकांच्या मुळावरवादळांनी बिघडवले, ऋतूचक्रात झाले मोठे बदल

रत्नागिरी : लांबलेला पाऊस, हवामानातील सातत्यपूर्ण बदल आणि ह्यक्यारह्ण तसेच ह्यमाहाह्ण वादळ यामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. यावर्षीचा आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा होणार आहे. काजूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय वाल, कुळीथ, पावटा या पिकांची उत्पादकता घटली आहे. चिकूचा आकार कमी झाला असून, रातांब्याच्या झाडांना अद्याप फुलोरा आलेला नाही.रत्नागिरीबरोबर कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असणाऱ्या आंबा पिकाचा हंगाम बदलत्या हवामानामुळे उशिरा होणार आहे. जानेवारीपासून थंडी सुरू झाल्याने फुलोरा उशिरा सुरू झाला, शिवाय फळधारणेचे प्रमाणही कमी आहे. ऑगस्टमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी संरक्षण केल्याने आंबा बाजारात आला असला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

हवामानात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलामुळे कीड, बुरशी, थ्रीप्स, तुडतुडा, उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा अंदाज घेत फवारणी करावी लागत आहे. सध्या वाटाणा ते सुपारी आकाराची फळे असली तरी आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता आहे. शिवाय थंडीचे प्रमाण वाढले तर मात्र फळधारणेला धोका पोहोचू शकतो. बदलत्या हवामानामुळे आंबा पिकाची उत्पादकता घटू लागली आहे.लांबलेल्या पावसामुळे काजू कलमांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फांदीमर रोगाची लागण होऊन बागांचे नुकसान होऊ लागले आहे. याशिवाय नवीन पालवीवर मॉस्क्युटो व फुलकिडी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने नवीन पालवी वाळू लागली आहे. परिणामी यावर्षी काजूची उत्पादकता कमी असून, काजूबीच्या आकारावरही परिणाम झाला आहे.पावसाळ्यातील भात कापणीनंतर कुळीथ, पावटा व वाल लागवड केली जाते. यावर्षी पाऊसच लांबल्याने कुळीथ, पावटा लागवड उशिरा करण्यात आली. नदीकाठच्या गावात वाल, कुळीथ लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जमिनीतील ओलाव्यामुळे कुळीथ व पावट्याची रोपे तरारली आहेत. शाखा वाढल्या आहेत. परंतु उष्म्यामुळे पावट्याला फुले येत नसल्यामुळे शेंगा लागणे अशक्य आहे.

कुळीथही बहरला असला तरी त्यालाही शेंगा नाहीत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी वेळेत लागवड केली, त्यांच्याकडील कुळीथ व पावटा पीक मात्र चांगले आहे. पावट्याच्या पानांवर किडीचा प्रादुर्भाव होऊन पाने पिवळी पडत आहेत. शिवाय उष्णता वाढल्याने फुले येत नाहीत, त्यामुळे शेंगा धरू शकत नसल्याने काही गावांतील शेतकऱ्यांनी पावट्याची रोपे काढून गुरांना घातली आहेत.कोकणातील महत्वपूर्ण पिकाबरोबर चिकूचेही उत्पादन घेतले जात असले तरी याचे प्रमाण अल्प आहे. परंतु यावर्षी चिकूच्या उत्पादकतेवर परिणाम झाला असून, आकारही कमी झाला आहे. निसर्गातील बदलाचा खूप मोठा परिणाम कोकणातील सर्वच पिकांच्या उत्पादकतेवर झाला आहे.

यावर्षी पाऊस लांबल्यामुळेच जिल्ह्यातील पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. आंबा, काजू, रातांब्याला फुलोरा उशिरा असल्याने नियोजित हंगामापेक्षा हंगाम उशिरा सुरू होणार हे निश्चित असले तरी कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावटा, कुळीथाची रोपे बहरली असली तरी त्यावर शेंगा नाहीत, पानावर किडीचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे यावर्षी कुळीथ, पावट्याची उत्पादकता घटली आहे. चिकूच्या आकारातही यावर्षी बदल झाला असून तो कमी झाला आहे.- चंद्रकांत खानविलकर,शेतकरी, उक्षी, ता. रत्नागिरी.

कोकणातील महत्वपूर्ण पीक म्हणजे कोकम. रातांब्याच्या फळांवर प्रक्रिया करून आमसुले, आगळ, सरबत, बियांपासून तेल तयार केले जाते. जानेवारीपासून रातांब्याच्या झाडाला फुलोरा येण्यास प्रारंभ होतो. मात्र, यावर्षी लांबलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहिला असल्याने अद्याप फुलोरा नाही. 

टॅग्स :fruitsफळेRatnagiriरत्नागिरी