शिवसेनेचा रत्नागिरीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:51 IST2017-09-11T22:51:42+5:302017-09-11T22:51:42+5:30

Shiv Sena's Ratnagiri Morcha | शिवसेनेचा रत्नागिरीत मोर्चा

शिवसेनेचा रत्नागिरीत मोर्चा



लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : दसºयापूर्वी राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्ती मिळावी, या मागणीसाठी सोमवारी रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्य सरकारने करून तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनही त्याचा लाभ शेतकºयांना मिळत नाही. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे शेतकºयांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्वच शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी शिवसेनेने सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
आठवडा बाजार येथून मोर्चाला सुरुवात झाली. यात आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापूकर, उपजिल्हाप्रमुख (शहर) संजय साळवी, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, योगेश कदम, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शिष्टमंडळाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी स्वीकारले.
पोलिसांशी बाचाबाची
आठवडा बाजारातून आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेल्यानंतर दोन आमदार, जिल्हाप्रमुखांसह एक शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले. सर्वांना आत सोडले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांची आणि सेना पदाधिकाºयांची बाचाबाची झाली. मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केलेल्या सूचनेमुळे सर्वांना आत पाठविण्यात आले आणि वाद मिटला.

Web Title: Shiv Sena's Ratnagiri Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.