शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

शिवसेनेची खेळी, स्थानिक भाजपला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली तरी ही अटक, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली तरी ही अटक, त्यासाठी झालेले आंदाेलन या साऱ्यातून स्थानिक भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बलाढ्य असलेल्या शिवसेनेला सामोरे जाण्याचे धाडस भाजपमध्ये नव्हते. मात्र आता अटकेच्या प्रकारानंतर भाजपही शिवसेनेला आक्रमकपणे तोंड देण्यास सज्ज झाला आहे. या कारवाईमुळे दुखावले गेलेले नारायण राणे आता अधिक आक्रमकपणे वाटचाल करतील, अशी शक्यता असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला आहे.

मंगळवारचा दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी वेगळाच होता. सकाळी सात, साडेसात वाजल्यापासूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची चर्चा सुरू झाली. त्यापाठोपाठच कोणत्याही क्षणी राणे यांना अटक केली जाण्याची शक्यताही वर्तवली जाऊ लागली. त्यामुळे वातावरण एक प्रकारचा तणाव आला. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे चित्र तयार होऊ लागले. हे शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशाच लढाईचे चित्र होते. त्यामुळे काहीतरी घडणार, अशी शक्यता तयार झाली.

या साऱ्याची ठिणगी प्रथम चिपळुणात पडली. चिपळुणात शिवसेनेने राणे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. एरवी शिवसेनेच्या आंदोलनाला दुसरी बाजू नसते. शिवसेनेचे आंदोलन एकतर्फी होते. मात्र यावेळी शिवसेनेच्या घोषणाबाजीला माजी खासदार नीलेश राणे सामोरे गेले. चिपळुणात प्रथम या दोन पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. निदर्शने करणाऱ्यांना आवरा, असे नीलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना सांगत होते. त्यामुळे अशा आंदोलनात मागे असणारे भाजपचे कार्यकर्ते तेवढ्याच त्वेषाने पुढे आले. चिपळूणनंतर आरवलीमध्येही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेथेही भाजप कार्यकर्ते मागे न हटता आक्रमकपणे पुढे आले.

भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होण्याची वेळ याआधी आली नव्हती. आता नारायण राणे, नीलेश राणे पाठीशी असल्याने भाजप कार्यकर्ते शिवसेनेला उत्तर देण्यासाठी तेवढ्याच आवेशाने पुढे झाले, हा भाजपसाठी मोठा बदल आहे. ही मानसिकता भाजपच्या नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना मोठे बळ देणारी आहे.

....................

आजवर भाजप दबलेलाच

ज्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची युती होती, तेव्हाही शिवसेनेच्या बलाढ्य ताकदीमुळे भाजप कायम दबलेलाच पक्ष होता. आधी जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा असताना भाजपला फक्त दोन जागा होत्या. नंतर त्या पाच जागा झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला एकच जागा आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही युती असली तरी शिवसेनेचे संख्याबळ मोठे असल्याने नेहमीच शिवसेनेने भाजपला पद देताना दुजाभाव दाखवला होता. त्यामुळे भाजप केवळ शिवसेनेच्या मागून फरपटत जात होता.

...............

युती तुटली, भाजप खोलातच

शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर भाजप अधिकच खोलात गेली. भाजपची स्वत:ची मते कायम असली तरी ती निवडून येण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मानसिक स्थिती कायमच पराभूताची होती. शिवसेनेची साथ सुटल्यानंतर भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मोठे यश मिळाले नाही. मात्र आता नारायण राणे भाजपमध्ये आल्याने आणि विशेषत: मंगळवारच्या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या या मानसिकतेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

..............

थोड्याचवेळात नवे फलक

मंगळवारी सकाळच्या सत्रात शिवसेनेने आक्रमकपणे आंदोलन सुरू केले. रत्नागिरी शहरातही त्याचे पडसाद उमटले. मारुतीमंदिर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे फलक फाडले. एरवी भाजपचे कार्यकर्ते अशा घटनेनंतर निषेध करुन शांत राहिले असते. मात्र हे फलक फाडल्यानंतर काही वेळातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवे फलक लावले. भाजप कार्यकर्त्यांची ही बदललेली मानसिकता शिवसेनेच्या आंदोलनामुळेच पुढे आली आहे.