शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

शिवसेनेची खेळी, स्थानिक भाजपला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली तरी ही अटक, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली तरी ही अटक, त्यासाठी झालेले आंदाेलन या साऱ्यातून स्थानिक भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बलाढ्य असलेल्या शिवसेनेला सामोरे जाण्याचे धाडस भाजपमध्ये नव्हते. मात्र आता अटकेच्या प्रकारानंतर भाजपही शिवसेनेला आक्रमकपणे तोंड देण्यास सज्ज झाला आहे. या कारवाईमुळे दुखावले गेलेले नारायण राणे आता अधिक आक्रमकपणे वाटचाल करतील, अशी शक्यता असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला आहे.

मंगळवारचा दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी वेगळाच होता. सकाळी सात, साडेसात वाजल्यापासूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची चर्चा सुरू झाली. त्यापाठोपाठच कोणत्याही क्षणी राणे यांना अटक केली जाण्याची शक्यताही वर्तवली जाऊ लागली. त्यामुळे वातावरण एक प्रकारचा तणाव आला. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे चित्र तयार होऊ लागले. हे शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशाच लढाईचे चित्र होते. त्यामुळे काहीतरी घडणार, अशी शक्यता तयार झाली.

या साऱ्याची ठिणगी प्रथम चिपळुणात पडली. चिपळुणात शिवसेनेने राणे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. एरवी शिवसेनेच्या आंदोलनाला दुसरी बाजू नसते. शिवसेनेचे आंदोलन एकतर्फी होते. मात्र यावेळी शिवसेनेच्या घोषणाबाजीला माजी खासदार नीलेश राणे सामोरे गेले. चिपळुणात प्रथम या दोन पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. निदर्शने करणाऱ्यांना आवरा, असे नीलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना सांगत होते. त्यामुळे अशा आंदोलनात मागे असणारे भाजपचे कार्यकर्ते तेवढ्याच त्वेषाने पुढे आले. चिपळूणनंतर आरवलीमध्येही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेथेही भाजप कार्यकर्ते मागे न हटता आक्रमकपणे पुढे आले.

भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होण्याची वेळ याआधी आली नव्हती. आता नारायण राणे, नीलेश राणे पाठीशी असल्याने भाजप कार्यकर्ते शिवसेनेला उत्तर देण्यासाठी तेवढ्याच आवेशाने पुढे झाले, हा भाजपसाठी मोठा बदल आहे. ही मानसिकता भाजपच्या नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना मोठे बळ देणारी आहे.

....................

आजवर भाजप दबलेलाच

ज्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची युती होती, तेव्हाही शिवसेनेच्या बलाढ्य ताकदीमुळे भाजप कायम दबलेलाच पक्ष होता. आधी जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा असताना भाजपला फक्त दोन जागा होत्या. नंतर त्या पाच जागा झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला एकच जागा आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही युती असली तरी शिवसेनेचे संख्याबळ मोठे असल्याने नेहमीच शिवसेनेने भाजपला पद देताना दुजाभाव दाखवला होता. त्यामुळे भाजप केवळ शिवसेनेच्या मागून फरपटत जात होता.

...............

युती तुटली, भाजप खोलातच

शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर भाजप अधिकच खोलात गेली. भाजपची स्वत:ची मते कायम असली तरी ती निवडून येण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मानसिक स्थिती कायमच पराभूताची होती. शिवसेनेची साथ सुटल्यानंतर भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मोठे यश मिळाले नाही. मात्र आता नारायण राणे भाजपमध्ये आल्याने आणि विशेषत: मंगळवारच्या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या या मानसिकतेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

..............

थोड्याचवेळात नवे फलक

मंगळवारी सकाळच्या सत्रात शिवसेनेने आक्रमकपणे आंदोलन सुरू केले. रत्नागिरी शहरातही त्याचे पडसाद उमटले. मारुतीमंदिर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे फलक फाडले. एरवी भाजपचे कार्यकर्ते अशा घटनेनंतर निषेध करुन शांत राहिले असते. मात्र हे फलक फाडल्यानंतर काही वेळातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवे फलक लावले. भाजप कार्यकर्त्यांची ही बदललेली मानसिकता शिवसेनेच्या आंदोलनामुळेच पुढे आली आहे.