शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
4
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
5
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
6
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
7
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
8
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
9
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
10
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
11
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
12
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
13
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
14
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
15
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
16
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा
17
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या
18
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
19
Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
20
Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरपासून गुरूचे अतिचारी भ्रमण; स्वामीकृपेने डिसेंबरपर्यंत शुभ काळ!

खासदार अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेचा भाजपविरोधात प्रतिमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:34 IST

Shiv Sena Bjp Morcha ratnagiri- खासदार विनायक राऊत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व नीलेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर लांजा भाजपतर्फे खासदार विनायक राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने मोर्चा काढत खासदार यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा भाजपविरोधात प्रतिमोर्चाखासदार अवमान केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करा

लांजा : खासदार विनायक राऊत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व नीलेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर लांजा भाजपतर्फे खासदार विनायक राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने मोर्चा काढत खासदार यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.सिंधुदुर्ग येथील रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते.

या प्रकारानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना संपर्क कार्यालय ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढून आपल्या निषेध व्यक्त केला. या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जया माने, सभापती लीला घडशी, उपसभापती दीपाली दळवी-साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मणचेकर, पंचायत समिती सदस्य संजय नवाथे, मानसी आंबेकर, नगरसेवक सोनाली गुरव, पूर्वा मुळे, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्षा यामिनी जोईल, माजी नगराध्यक्ष सुनील कुरुप, दिलीप पळसुळे-देसाई, राहुल शिंदे आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होतेकारवाई कराचमनाई आदेश असताना भाजप कार्यकर्त्यांनी जमाव गोळा करून खासदारांना अवमानकारक शब्द उच्चारुन त्यांचा पुतळा दहन केला. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे निवेदन तहसीलदार समाधान गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMorchaमोर्चाBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी