शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्यात शिवसैनिकांनी केली भात लावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:49 IST

अधिकाऱ्यांची गाडी अडवून विचारला जाब

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे शिवसेनेने आज, सोमवारी सावर्डे येथे खड्यांमध्ये भात लावणी करत अनोखे आंदोलन केले. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संदिप सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वालोपे ते सावर्डे दरम्यान मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्याची मागणी संदिप सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. आठ दिवसात खड्डे न बुजविले गेले तर खड्यांमध्ये भात लावणी करेन असा इसारा सावंत यांनी दिला होता. तरी देखील प्रशासनाने हे खड्डे बुजविले नाहीत.यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज, अनोखे आंदोलन करत खड्यातच भात लावणी केली. दरम्यान, आरटीओचे अधिकारी रत्नागिरीतून चिपळूणला येत होते. शिवसेनेनी त्याचे वाहन अडवून खड्यांबाबत जाब विचारला. मात्र, आरटीओच्या अधिकाऱ्यांनी खड्यांबाबत हात वर करून ही राष्ट्रीय महामार्ग विभागाची जबाबदारी असल्याचे सांगितले. मात्र आरटीओ वाहनचालकांकडून कर वसूल करते. त्यामुळे तेही तितकेच जबाबदार असल्याचे सांगत सावंत यांनी आरटीओचा निषेध केला. पंधरा दिवसात खड्डे न बुजविले गेल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सावंत यांनी दिला.दरम्यान, खड्डे भरण्याचे काम सुरू असून आंदोलन करू नये, अशी लेखी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून संदिप सावंत यांना देण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग