शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्यात शिवसैनिकांनी केली भात लावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:49 IST

अधिकाऱ्यांची गाडी अडवून विचारला जाब

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे शिवसेनेने आज, सोमवारी सावर्डे येथे खड्यांमध्ये भात लावणी करत अनोखे आंदोलन केले. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संदिप सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वालोपे ते सावर्डे दरम्यान मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्याची मागणी संदिप सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. आठ दिवसात खड्डे न बुजविले गेले तर खड्यांमध्ये भात लावणी करेन असा इसारा सावंत यांनी दिला होता. तरी देखील प्रशासनाने हे खड्डे बुजविले नाहीत.यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज, अनोखे आंदोलन करत खड्यातच भात लावणी केली. दरम्यान, आरटीओचे अधिकारी रत्नागिरीतून चिपळूणला येत होते. शिवसेनेनी त्याचे वाहन अडवून खड्यांबाबत जाब विचारला. मात्र, आरटीओच्या अधिकाऱ्यांनी खड्यांबाबत हात वर करून ही राष्ट्रीय महामार्ग विभागाची जबाबदारी असल्याचे सांगितले. मात्र आरटीओ वाहनचालकांकडून कर वसूल करते. त्यामुळे तेही तितकेच जबाबदार असल्याचे सांगत सावंत यांनी आरटीओचा निषेध केला. पंधरा दिवसात खड्डे न बुजविले गेल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सावंत यांनी दिला.दरम्यान, खड्डे भरण्याचे काम सुरू असून आंदोलन करू नये, अशी लेखी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून संदिप सावंत यांना देण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग