शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

..तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 14:02 IST

राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे.

रत्नागिरी : स्थानिक लोकांच्या मागणीवर शिवसेना अवलंबून आहे. स्थानिकांनी प्रकल्पाचे समर्थन केले तर त्याठिकाणी रिफायनरी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक भूमिका घेईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी रिफायनरीला समर्थन दिल्याचे वक्तव्य केल्याने रिफायनरीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे.मात्र, या भागातील ग्रामस्थांनी रिफायनरीला पाठिंबा देत रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे शिवसेनाही आता एक पाऊल मागे आली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवावा, असे वक्तव्य केले आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, स्थानिकांच्या मागणीवर शिवसेना अवलंबून असल्याचे वारंवार आम्ही सांगितले आहे.स्थानिकांनी प्रकल्पाचे समर्थन केल्यास रिफायनरी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक भूमिका घेईल. रिफायनरीबाबत लोकांमधील गैरसमज दूर केले पाहिजेत. जे नकारात्मक आहेत, त्यांना सकारात्मक केले पाहिजे. चांगली पॅकेजीस दिली पाहिजेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.रिफायनरीबाबत शिवसेनेने युटर्न घेतला आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री उदय सामंत म्हणाले की, यात युटर्न कसला? आम्ही सुरुवातीपासून लोकांसोबत राहिलो आहोत. लोकांनी जर प्रकल्पाचे समर्थन केले तर शिवसेना लोकांच्या मागणीचा आदर करेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतRajapurराजापुरShiv Senaशिवसेना