शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Green refinery project: ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनाच अजून संभ्रमात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:01 IST

मनोज मुळ्ये रत्नागिरी : देशातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरावी, अशा प्रकल्पासाठी सहा वर्षे सरकारला जागा देता येत नाही, ही ...

मनोज मुळ्येरत्नागिरी : देशातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरावी, अशा प्रकल्पासाठी सहा वर्षे सरकारला जागा देता येत नाही, ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट सुरूच असताना आता बारसू या नव्या जागेबाबतही स्वत: सत्ताधारी शिवसेनाच संभ्रमात असल्याचे दिसत आहे. एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी बारसूमध्ये रिफायनरीसाठी जागा देण्याची सरकारची तयारी असल्याचे पत्र पंतप्रधानांना दिले आहे, तर दुसऱ्या बाजूला आता शिवसेनेचे मंत्री अनिल परब मात्र हे पत्र म्हणजे शासकीय औपचारिकता असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा प्रकल्प हवाय की नकोय, हे खुद्द शिवसेनेलाही समजले नसल्याचे दिसत आहे.जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी जागा देण्यास सरकार तयार असल्याचे कळवले. मुख्यमंत्र्यांचे हे पत्र मार्चमध्ये जाहीर झाले. त्याआधीच बारसूबाबतच्या हालचाली अधिक गतिमान झाल्या होत्या. प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची राजापुरातील एका शिष्टमंडळाने भेट घेतली. तेव्हा लवकरच या जागेची पाहणी केंद्रीय पथक करेल, अशी माहिती त्यांनी दिली. मार्चमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यातही रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक विधाने केली. एकूणच शिवसेनेने पक्षपातळीवर हा प्रकल्प बारसूमध्ये करण्याची भूमिका घेतले असल्याचे चित्र दिसू लागले.याचदरम्यान प्रत्येक प्रकल्पाला फक्त विरोधच करणाऱ्या काही मंडळींनी बारसू येथेही हा प्रकल्प उभारण्यास विरोध केला. त्यामुळे आता शिवसेनेने एक पाऊल मागे टाकले आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला रत्नागिरीत आलेले पालकमंत्री व परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांचे ते पत्र म्हणजे शासकीय औपचारिकता असल्याच्या आशयाचे विधान केले आहे. लोकांचे म्हणणे ऐकल्याशिवाय प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असेच जुने तुणतुणे त्यांनी वाजवले आहे.चार लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी हालचाली सुरू झाल्या, त्याला आता सहा वर्षे झाली आहेत. मात्र या सहा वर्षांत राज्य सरकार त्यांना जागा उपलब्ध करून देऊ शकलेले नाही. देशातील सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाबाबत सरकार कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, हीच मोठी दुर्दैवी बाब आहे. प्रकल्प हवा की नको, हेच अजून शिवसेनेला नक्की करता आलेले नाही.

भाजपचे लोटांगण२०१६/१७ सालापासून रिफायनरी चर्चेत आहे. कंपनीने केलेल्यापाहणीत नाणार, सागवे परिसरातील १४ गावांमधील जागा प्रथम निवडण्यात आली. मात्र काही लोकांचा विरोध आणि आम्ही लोकांच्या बाजूने ही सेनेची राजकीय भूमिका यामुळे हा प्रकल्प वादात सापडला. २०१९च्या लोकसभेसाठी शिवसेनेची साथ मिळवण्यासाठी भाजपने प्रकल्पाची अधिसूचना रद्द करुन लोटांगण घातले.

समर्थकांशी चर्चाच नाहीप्रकल्प हवाय असे म्हणत अनेक लोक उभे राहिले. पण शिवसेनेने त्यांची बाजू कधी ऐकूनच घेतली आहे. २०१९ मध्ये भाजपची साथ सोडून शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी करुन नवा मार्ग शोधला. त्यानंतरही शिवसेनेने आपला हट्ट सोडला नाही. दरम्यान, बारसूच्या जागेचा विषय पुढे आला आणि शिवसेनेची भूमिका बदलल्यासारखी वाटली.

शिवसेना मागे आली?चार लोकांनी विरोधाचा आवाज काढल्यानंतर प्रकल्प बारसूत होणार असे म्हणणारी शिवसेना परत बॅकफूटवर जाऊ लागली आहे.

ठाम निर्णय नाहीविरोधाचा जरासा सूर निघाल्यानंतर शिवसेनेने आपली भूमिका परत मवाळ केली आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मुळात गेल्या काही महिन्यात सरकारी यंत्रणांच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक हालचाली होत असल्या तरी शिवसेनेने अजून कसलाच ठाम निर्णय घेतलेला नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पShiv Senaशिवसेना