शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:58 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना - भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोनजिल्हाध्यक्षांशी चर्चा, भाजप-शिवसेना कोअर कमिटीची आज बैठक

रत्नागिरी : जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये रुसवे फुगव्यांचे वातावरण आहे. काही जणांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे ते बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात होते, तर काही जण प्रचारात सहभागी होणार नाहीत, असे चित्र होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा कमिटी यांच्यासोबत समन्वय राखला गेला पाहिजे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी स्थापन करण्याची सूचना अ‍ॅड. पटवर्धन यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत त्या दृष्टीने लक्ष घालण्याचे आश्वासन पटवर्धन यांना दिले. त्यामुळे पुढील दोन आठवडे प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये सुयोग्य समन्वय राखला जाण्याची शक्यता आहे.राज्यात भाजप - शिवसेना महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करायचे आहे. त्यामुळेच काही जागांवर शिवसेनेने व रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने माघार घेतली आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होण्याकरिता भाजपची साथ आवश्यक आहे. यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यात संभाषण झाले, असे थेट बोलणे झालेले अ‍ॅड. पटवर्धन हे भाजपचे पहिले जिल्हाध्यक्ष ठरले.

पूर्वीच्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला रत्नागिरी व गुहागरची जागा मिळत होती. या दोन्ही जागांवर यशही मिळत होते. रायगड, पुण्यातील सर्व जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना लढवत असल्याचे सांगण्यात आले.नेते, उमेदवार बैठकीतरत्नागिरीत आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये भाजपचे जिल्हास्तरावरील महत्त्वाचे दहा पदाधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत, भास्कर जाधव, सदानंद चव्हाण, योगेश कदम आणि राजन साळवी हे बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी