शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:58 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना - भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोनजिल्हाध्यक्षांशी चर्चा, भाजप-शिवसेना कोअर कमिटीची आज बैठक

रत्नागिरी : जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये रुसवे फुगव्यांचे वातावरण आहे. काही जणांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे ते बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात होते, तर काही जण प्रचारात सहभागी होणार नाहीत, असे चित्र होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा कमिटी यांच्यासोबत समन्वय राखला गेला पाहिजे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी स्थापन करण्याची सूचना अ‍ॅड. पटवर्धन यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत त्या दृष्टीने लक्ष घालण्याचे आश्वासन पटवर्धन यांना दिले. त्यामुळे पुढील दोन आठवडे प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये सुयोग्य समन्वय राखला जाण्याची शक्यता आहे.राज्यात भाजप - शिवसेना महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करायचे आहे. त्यामुळेच काही जागांवर शिवसेनेने व रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने माघार घेतली आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होण्याकरिता भाजपची साथ आवश्यक आहे. यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यात संभाषण झाले, असे थेट बोलणे झालेले अ‍ॅड. पटवर्धन हे भाजपचे पहिले जिल्हाध्यक्ष ठरले.

पूर्वीच्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला रत्नागिरी व गुहागरची जागा मिळत होती. या दोन्ही जागांवर यशही मिळत होते. रायगड, पुण्यातील सर्व जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना लढवत असल्याचे सांगण्यात आले.नेते, उमेदवार बैठकीतरत्नागिरीत आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये भाजपचे जिल्हास्तरावरील महत्त्वाचे दहा पदाधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत, भास्कर जाधव, सदानंद चव्हाण, योगेश कदम आणि राजन साळवी हे बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी