शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:58 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना - भाजपच्या मनोमीलनासाठी मातोश्रीवरून फोनजिल्हाध्यक्षांशी चर्चा, भाजप-शिवसेना कोअर कमिटीची आज बैठक

रत्नागिरी : जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर या बैठकीचा निर्णय झाला.विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये रुसवे फुगव्यांचे वातावरण आहे. काही जणांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे ते बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात होते, तर काही जण प्रचारात सहभागी होणार नाहीत, असे चित्र होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा कमिटी यांच्यासोबत समन्वय राखला गेला पाहिजे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी स्थापन करण्याची सूचना अ‍ॅड. पटवर्धन यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत त्या दृष्टीने लक्ष घालण्याचे आश्वासन पटवर्धन यांना दिले. त्यामुळे पुढील दोन आठवडे प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये सुयोग्य समन्वय राखला जाण्याची शक्यता आहे.राज्यात भाजप - शिवसेना महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करायचे आहे. त्यामुळेच काही जागांवर शिवसेनेने व रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने माघार घेतली आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होण्याकरिता भाजपची साथ आवश्यक आहे. यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यात संभाषण झाले, असे थेट बोलणे झालेले अ‍ॅड. पटवर्धन हे भाजपचे पहिले जिल्हाध्यक्ष ठरले.

पूर्वीच्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला रत्नागिरी व गुहागरची जागा मिळत होती. या दोन्ही जागांवर यशही मिळत होते. रायगड, पुण्यातील सर्व जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना लढवत असल्याचे सांगण्यात आले.नेते, उमेदवार बैठकीतरत्नागिरीत आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये भाजपचे जिल्हास्तरावरील महत्त्वाचे दहा पदाधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत, भास्कर जाधव, सदानंद चव्हाण, योगेश कदम आणि राजन साळवी हे बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी