शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

जे गेले त्यांचे बाेलवते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, खासदार विनायक राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 19:08 IST

शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील

रत्नागिरी :  उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर अजूनही आपली तारीख नाही. शिवसेनेचे धनुष्य पळवणारे अजूनही जन्माला आलेले नाहीत. शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील. गेले त्यांचे बोलावते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात रविवारी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, प्रदीप बोरकर, सहजिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.एका माणसाला मी शोधतोय, राजन साळवींचा सत्कार करायला येणार होता. गद्दारांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. पक्ष साेडून गेलेले आता आम्ही शिवसेनेचे असे सांगायला लागले आहेत. अशी टिकाही खासदार राऊत यांनी केली. यापुढे कोणत्याही गद्दराला शिवसेनेत प्रवेश नाही असे जाहीर केले.रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लक्ष्य करत ते म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर आरोप करून गेले तरी ते म्हणताहेत आम्ही शिवसैनिक.आपले पणाच्या भावनेने तुम्हाला जवळ केले. मातोश्रीवर स्वतःच्या हाताने बनवलेले अन्न घातलेे. म्हाडाचे पद दिले, मंत्री केले. आदित्य ठाकरे यांनी फक्त उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासह फिरले. मातोश्रीच्या अन्नाची पण किंमत का नाही ठेवली. ज्या शिवसेनेने राजकीय अस्तित्व दिले, त्याच शिवसेनेला संपवायची भाषा हे करत आहेत. अशी अनेक बंड आम्ही पाहिली आहेत. हिंमत असेल तर राजीनामा द्या, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, ज्यावेळी उध्दव ठाकरेंना आधारची गरज होती, त्यावेळी हे पळून गेले. कोणत्या अधिकारात राजन साळवींच्या सत्काराला यायची वक्तव कराल, असेही खासदार विनायक राऊत यांनी ठणकावले.

आमदारकी बाळासाहेबांच्या चरणी : राजन साळवीउदय सामंत २०१४ मध्ये शिवसेनेत आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे डोक्यात ठेवूनच शिवसेनेचा एक आमदार म्हणून सामंत आमदार झाले. पुढे ते म्हाडा अध्यक्ष, उपनेते आणि कॅबिनेट मंत्रीही झाले. यावेळी माझ्यावर अन्याय झाला, पण निष्ठा शिवसेनेशी आहे. आता आमदारकी गेली तरी चिंता नाही, ती बाळासाहेबांच्या चरणाशी अर्पण करतो, असे आमदार राजन साळवी म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत