शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जे गेले त्यांचे बाेलवते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, खासदार विनायक राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 19:08 IST

शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील

रत्नागिरी :  उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर अजूनही आपली तारीख नाही. शिवसेनेचे धनुष्य पळवणारे अजूनही जन्माला आलेले नाहीत. शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील. गेले त्यांचे बोलावते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात रविवारी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, प्रदीप बोरकर, सहजिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.एका माणसाला मी शोधतोय, राजन साळवींचा सत्कार करायला येणार होता. गद्दारांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. पक्ष साेडून गेलेले आता आम्ही शिवसेनेचे असे सांगायला लागले आहेत. अशी टिकाही खासदार राऊत यांनी केली. यापुढे कोणत्याही गद्दराला शिवसेनेत प्रवेश नाही असे जाहीर केले.रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लक्ष्य करत ते म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर आरोप करून गेले तरी ते म्हणताहेत आम्ही शिवसैनिक.आपले पणाच्या भावनेने तुम्हाला जवळ केले. मातोश्रीवर स्वतःच्या हाताने बनवलेले अन्न घातलेे. म्हाडाचे पद दिले, मंत्री केले. आदित्य ठाकरे यांनी फक्त उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासह फिरले. मातोश्रीच्या अन्नाची पण किंमत का नाही ठेवली. ज्या शिवसेनेने राजकीय अस्तित्व दिले, त्याच शिवसेनेला संपवायची भाषा हे करत आहेत. अशी अनेक बंड आम्ही पाहिली आहेत. हिंमत असेल तर राजीनामा द्या, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, ज्यावेळी उध्दव ठाकरेंना आधारची गरज होती, त्यावेळी हे पळून गेले. कोणत्या अधिकारात राजन साळवींच्या सत्काराला यायची वक्तव कराल, असेही खासदार विनायक राऊत यांनी ठणकावले.

आमदारकी बाळासाहेबांच्या चरणी : राजन साळवीउदय सामंत २०१४ मध्ये शिवसेनेत आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे डोक्यात ठेवूनच शिवसेनेचा एक आमदार म्हणून सामंत आमदार झाले. पुढे ते म्हाडा अध्यक्ष, उपनेते आणि कॅबिनेट मंत्रीही झाले. यावेळी माझ्यावर अन्याय झाला, पण निष्ठा शिवसेनेशी आहे. आता आमदारकी गेली तरी चिंता नाही, ती बाळासाहेबांच्या चरणाशी अर्पण करतो, असे आमदार राजन साळवी म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत