शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

जे गेले त्यांचे बाेलवते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, खासदार विनायक राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 19:08 IST

शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील

रत्नागिरी :  उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर अजूनही आपली तारीख नाही. शिवसेनेचे धनुष्य पळवणारे अजूनही जन्माला आलेले नाहीत. शिवसेनेचे भगवे तेज तेवढ्याच ताकदीने उभे राहील. गेले त्यांचे बोलावते धनी दिल्लीतील पातशहा आहेत, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात रविवारी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, प्रदीप बोरकर, सहजिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.एका माणसाला मी शोधतोय, राजन साळवींचा सत्कार करायला येणार होता. गद्दारांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. पक्ष साेडून गेलेले आता आम्ही शिवसेनेचे असे सांगायला लागले आहेत. अशी टिकाही खासदार राऊत यांनी केली. यापुढे कोणत्याही गद्दराला शिवसेनेत प्रवेश नाही असे जाहीर केले.रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लक्ष्य करत ते म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर आरोप करून गेले तरी ते म्हणताहेत आम्ही शिवसैनिक.आपले पणाच्या भावनेने तुम्हाला जवळ केले. मातोश्रीवर स्वतःच्या हाताने बनवलेले अन्न घातलेे. म्हाडाचे पद दिले, मंत्री केले. आदित्य ठाकरे यांनी फक्त उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासह फिरले. मातोश्रीच्या अन्नाची पण किंमत का नाही ठेवली. ज्या शिवसेनेने राजकीय अस्तित्व दिले, त्याच शिवसेनेला संपवायची भाषा हे करत आहेत. अशी अनेक बंड आम्ही पाहिली आहेत. हिंमत असेल तर राजीनामा द्या, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, ज्यावेळी उध्दव ठाकरेंना आधारची गरज होती, त्यावेळी हे पळून गेले. कोणत्या अधिकारात राजन साळवींच्या सत्काराला यायची वक्तव कराल, असेही खासदार विनायक राऊत यांनी ठणकावले.

आमदारकी बाळासाहेबांच्या चरणी : राजन साळवीउदय सामंत २०१४ मध्ये शिवसेनेत आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे डोक्यात ठेवूनच शिवसेनेचा एक आमदार म्हणून सामंत आमदार झाले. पुढे ते म्हाडा अध्यक्ष, उपनेते आणि कॅबिनेट मंत्रीही झाले. यावेळी माझ्यावर अन्याय झाला, पण निष्ठा शिवसेनेशी आहे. आता आमदारकी गेली तरी चिंता नाही, ती बाळासाहेबांच्या चरणाशी अर्पण करतो, असे आमदार राजन साळवी म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत