शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

आता रडायचं नाही, लढायचं ते जिंकण्यासाठीच, शिवसेना नेते सुभाष देसाई यांची शिवगर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 18:20 IST

हक्काची जागा सोडून तुकड्यासाठी त्यांनी गुलामगिरी पत्करली

देवरुख : भाजपने चार तुकडे फेकले म्हणून हे पळून गेले. तुम्हाला जे हवे होते, ते उद्धव ठाकरेंकडे मागायला पाहिजे होते. त्यांनी दिलदारपणाने तुम्हाला दिले असते. या मिन्धेसाठी काय कमी केले होते ? दुसऱ्याच्या चाकरीसाठी जे जातात, त्यांची कीव करावी वाटते. आपली हक्काची जागा सोडून तुकड्यासाठी त्यांनी गुलामगिरी पत्करली. मात्र, हा खेळ जास्त दिवस टिकणारा नाही. आता गेलेले वैभव परत कसे मिळवायचे त्याकडे जास्त लक्ष देऊया. ‘आता रडायचं नाही, लढायचं ते जिंकण्यासाठीच’ असे प्रतिपादन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी देवरुख येथे केले.उद्धव ठाकरे शिवसेनेच्या संगमेश्वर तालुक्याच्या शिवगर्जना अभियानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेला संघर्ष करणे नवीन नाही. गेलेले वैभव पुन्हा मिळवण्यासाठी संघर्ष करू. हक्काचा धनुष्यबाण मिळत नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही. आपले ऐश्वर्य परत मिळवू. गद्दारी करून जे गेलेत त्यांचा अंत अटळच आहे.प्रस्तावनेत माजी आ. सुभाष बने म्हणाले की, जे आमचे नव्हते, ते निघून गेले. त्यांची मजुरी संपली. आता मशाल घेऊन पुढे जायचे आहे. निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेलेला नाही.माजी राज्यमंत्री रवींद्र माने म्हणाले की, आपण निर्धाराने एकत्र आलो आहोत. त्यांना गाडून टाकल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही. ‘उषः काल होता होता, काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या ओळी म्हणत पुन्हा मशाली पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अनाजीपंतांच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांचे राज्य सत्तेवरून खाली खेचणाऱ्या गद्दारांना गाडून सूड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वास जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी व्यक्त केला.शिवगर्जना यात्रा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी, महानगरपालिकेतील तृष्णा विश्वासराव, माजीमंत्री रवींद्र माने, माजी आ. सुभाष बने, समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंर्पकप्रमुख राजेंद्र महाडीक, रत्नागिरी सिंधुदुर्ग महिला संपर्कप्रमुख नेहा माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, रचना महाडिक, मुंबईचे नगरसेवक उमेश माने, महिला संघटक वेदा फडके, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, रजनी चिंगळे, नंदादीप बोरकर, सुजित महाडिक, युवासेनेचे मुन्ना थरवळ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSubhash Desaiसुभाष देसाई