शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोकणातील राजकीय वातावरण तापलं, शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला; शिवसैनिक आक्रमक

By संदीप बांद्रे | Updated: October 19, 2022 14:03 IST

मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर भ्याड हल्लाची घटना घडल्याने उडाली खळबळ

चिपळूण : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या पाग येथील बंगल्यावर भ्याड हल्ला झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत संशयितांना ताब्यात घेतलं जात नाही, तोपर्यंत पोलीस स्थानकात ठिय्या मांडून बसणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. या घटनेमुळे चिपळूण पोलीस स्थानकाच्या आवारात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून शिवसेना नेते भास्कर जाधव व माजी खासदार निलेश राणे हे सातत्याने एकमेकांवर पातळी सोडून टीका करत आहे. सोमवारी चिपळूण येथील भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवत तोंडसुख घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिंधुदुर्ग येथे भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. या सभेत जाधव यांनी राणे पिता-पुत्रांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र त्यानंतर प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातच बुधवारी मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली. जाधव यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टम्प आढळल्या.या घटनेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रमुख सचिन कदम, बाळा कदम, संदीप सावंत, फैसल कास्कर, मोहन मिरगल, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत शाह यांच्या नेतृत्वाखाली येथील पोलिसांवर धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना घेराव घालण्यात आला.अचानक बंदोबस्त का हटवला?भास्कर जाधव यांच्या घराच्या ठिकाणी दोन पोलीस कॉन्स्टेबल कायम बंदोबस्तासाठी ठेवले होते. परंतु रात्री अचानक बंदोबस्त का हटवण्यात आला, कोणाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, अशा प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारला. तसेच या हल्ल्यामागे असलेल्यांना तात्काळ ताब्यात घ्या, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त काढून घेणे व देणे आपल्या अखत्यारीत नाही. तरी देखील या हल्ल्याची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र शिवसैनिकांनी संशयितांना ताब्यात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.

सिंधुदुर्गातील घटनेनंतर येथे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याची कल्पना काल, मंगळवारी पोलिसांना देण्यात आली होती. त्याप्रमाणे दोन पोलीस कॉन्स्टेबल बंदोबस्तासाठी ठेवले होते. मात्र रात्री दीड वाजता हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल तेथून निघून गेले. त्यानंतर हल्ल्याचा प्रकार घडला आहे. जाणीवपूर्वक महिला पोलीस बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले. याउलट भाजपच्या बंद कार्यालयासमोर बारा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचाच अर्थ पोलीस यंत्रणा कोणाच्यातरी दबाव खाली काम करीत आहेत. - विक्रांत जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणBhaskar Jadhavभास्कर जाधवBJPभाजपाShiv Senaशिवसेना