शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रत्नागिरी शिवसेनेत सध्या घडतंय बिघडतंय, पक्ष सोडून जाणाऱ्यांना थोपविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:06 IST

भास्कर जाधव राजन साळवी या दाेन आमदारांवरच आता जिल्ह्यातील शिवसेनेत हाेणारी पडझड राेखण्याची जबाबदारी

अरुण आडिवरेकररत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवत वेगळा गट तयार केला आहे. या गटात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापाेलीचे आमदार याेगेश कदम सामील झाले आहेत. त्यांचे समर्थन करत अनेकजण त्यांच्यासाेबत जात आहेत. त्यामुळे शिवसेनेत सध्या हलचल निर्माण झाली आहे. समर्थन करणाऱ्यांची उचलबांगडी केली जात आहे, तर पक्षातून काेणी जाऊ नये, यासाठी पदाधिकारी एकवटले आहेत. पक्षात सारे काही चांगले घडतंय, असे वाटत असतानाच पुन्हा सारे बिघडत असल्याने पदाधिकारीही संभ्रमात पडले आहेत.आमदार सामंत यांचे समर्थकही शिंदे गटाच्या दिशेने चालले आहेत. शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि आमदार सामंत समर्थकांनी त्यांच्या दाैऱ्यात हजेरी लावली. त्यामुळे उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला आघाडी संघटक कांचन नागवेकर यांना पदावरुन हटविण्यात आले. त्यांच्या जागी नव्याने नियुक्तीही झाली. मात्र, नियुक्ती हाेताच प्रकाश रसाळ यांनी उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला, तर तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनीही पद साेडले आहे.पक्षात नव्याने नियुक्त्या करुन पक्ष सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पक्षातून बाहेर जाणाऱ्यांना थाेपविण्याचे आव्हान पक्षासमाेर आहे. शिवसेनेचा गड आता अबाधित ठेवण्याची जबाबदारी शिलेदारांवर येऊन पडली आहे. पक्षाला सावरण्यासाठी जुने शिवसैनिक एकवटले आहेत. पक्षात सारे बिघडत असतानाच आता सावरण्यासाठी धडपड सुरु आहे.गड राखणे आव्हानआमदार सामंत आणि आमदार कदम यांना मानणारा गट आहे. ते त्यांच्यासाेबतच जाणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे हे गड राखण्याचे आव्हान शिलेदारांवर आहे. या मतदार संघातील घडामाेडींचा बाजूच्या मतदार संघांवरही परिणाम हाेण्याची चिन्हे आहेत.नाेंदणीचे शिवधनुष्यरत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या चार तालुक्यात एक लाख सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय घडामाेडीत सदस्य नाेंदणीचे हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. नाेंदणी केलेले कितीजण मनाने पक्षासाेबत राहणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.नगरसेवक संपर्कातशिवसेनेचे काही नगरसेवकही सामंत यांच्या बाजूने आहेत. त्यांनी दाैऱ्यात हजेरी लावल्याने हे नगरसेवक पक्षाच्या रडारवर आहेत. यापूर्वी दापाेली, मंडणगडातील अपक्ष नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. हे मूळचे शिवसैनिक आहेत. आता नगरसेवकही सामंत यांच्या साेबत जाण्याच्या तयारीत आहेत.यांच्यावर सारी भिस्तजिल्ह्यात शिवसेनेचे आमदार म्हणून उत्तर रत्नागिरीत भास्कर जाधव आणि दक्षिण रत्नागिरीत राजन साळवी कार्यरत आहेत. हे दाेन्ही आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच साेबत राहिले आहेत. त्यामुळे या दाेन आमदारांवरच आता जिल्ह्यातील शिवसेनेत हाेणारी पडझड राेखण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यांच्यावरच आता सारी भिस्त आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाkonkanकोकणEknath Shindeएकनाथ शिंदे