शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सागरी किनारी सुरक्षेचा विचार घेऊन निघाली ‘शीड नौका परिक्रमा’; उद्या रत्नागिरीतील मांडवी येथे येणार

By मनोज मुळ्ये | Updated: December 29, 2023 18:37 IST

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरी किनारी सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोहोचवण्यासाठी सागरी सीमा मंचने सागरी शीड नौका परिक्रमा आयोजित ...

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरी किनारी सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोहोचवण्यासाठी सागरी सीमा मंचने सागरी शीड नौका परिक्रमा आयोजित केली आहे. शिडाच्या नौकेने मुंबई ते विजयदुर्ग हा सागरी प्रवास होणार असून, ही नौका परिक्रमा शनिवारी (३० डिसेंबर) सायंकाळी ४ वाजता रत्नागिरीतील मांडवी येथे येणार आहे.

या परिक्रमेमध्ये ३० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. परिक्रमेदरम्यान चार ठिकाणी सागरी सुरक्षा व सागरी पर्यावरणाचे जागरण केले जाणार आहे. सागरी सीमा मंच व शिवशंभू विचार मंच या दोन संस्थांद्वारे शिडाच्या नौकेने ‘गेट वे ऑफ इंडिया’ ते विजयदुर्ग अशी परिक्रमा करण्यात येणार आहे. या परिक्रमेसाठी भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, सीमा शुल्क, सागरी पोलिस, मत्स्य विभाग यांचे सहकार्य मिळाले आहे. कुलाबा, मच्छीमारनगर येथे सागरी परिक्रमेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे आणि शिवशंभू विचारमंचचे प्रांत संयोजक अभय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

विजयदुर्गात १ राेजी समाराेपसागरी परिक्रमेदरम्यान खांदेरी किल्ला, कुलाबा किल्ला, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, रत्नदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम, किल्लापूजन, किल्लादर्शन करण्यात येणार आहे. अलिबाग, बुरोंडी (ता. दापोली), रत्नागिरी या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. १ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता सागरी परिक्रमेचा समारोप विजयदुर्ग येथे होणार आहे. यावेळी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आणि सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक ऋषीकेश रवाळे उपस्थित राहणार आहेत.

सागरी सीमांच्या सुरक्षांचे महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी किनारपट्टीवरील रहिवाशांना सोबत घेऊन आरमार उभे केले. त्यातून सरखेल कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, हिरोजी यांच्यासारखे लढवय्ये घडले. आजही सागरी सीमांच्या सुरक्षेचे महत्त्व तितकेच आहे. परिक्रमेदरम्यान सागरी सुरक्षा आणि प्लास्टिक प्रदूषण राेखण्याबाबत जागृती केली जात आहे. - केतन अंभिरे, प्रांत संयोजक, सागरी सीमा मंच

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग