शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

रेल्वे प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरुखचा दहशतवाद्यांशी संबंध?, पोलिसांनी रत्नागिरीत आवळल्या होत्या मुसक्या

By अरुण आडिवरेकर | Updated: April 12, 2023 12:13 IST

आजारामुळे तपासात अडथळे

रत्नागिरी : केरळ येथे रेल्वे प्रवासात प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरूख सैफी याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त होत आहे. त्याला रेल्वेचा पूर्ण डबाच पेटवून द्यायचा होता, अशीही माहिती आता समोर येत आहे. केरळमधील घटनेनंतर सैफी पसार झाला होता. त्यानंतर त्याला रत्नागिरी पोलिस व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तरित्या कारवाई करत ४ एप्रिल २०२३ रोजी रात्री रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर महाराष्ट्र एटीएस पथकाने सैफी याची चौकशी केली असता ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय महाराष्ट्र एटीएसकडून व्यक्त करण्यात आला होता.केरळ पोलिसांसोबतच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या घटनेचा तपास करत आहे. प्राथमिक तपासात सैफी हा दिल्ली येथील शाहीनबाग परिसरातील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच्यावर दहशतवादी विचारसणीचा प्रभाव पडत होता. तसेच त्याला अनुचित प्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे तपासात आढळले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू आहे.दिल्ली येथून तो केरळपर्यंत कसा आला, यांचा शोध पोलिस घेत आहेत. त्याला कोणीतरी केरळ येथे आणले असावेत असा संशय आहे. त्याच्याशी कोण व्यक्ती संपर्कात होत्या, याचाही तपास केला जात आहे. यासाठी त्याचा मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला असून, मागील ६ महिन्यातील कॉल डिटेल्स, व्हॉटसॲप, फेसबुकवरील संभाषण आदींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. आजारामुळे तपासात अडथळेकेरळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सैफी याला काविळचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला कोझीकोडे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास कामात अडथळे निर्माण होत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKeralaकेरळrailwayरेल्वेterroristदहशतवादी