शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

रेल्वे प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरुखचा दहशतवाद्यांशी संबंध?, पोलिसांनी रत्नागिरीत आवळल्या होत्या मुसक्या

By अरुण आडिवरेकर | Updated: April 12, 2023 12:13 IST

आजारामुळे तपासात अडथळे

रत्नागिरी : केरळ येथे रेल्वे प्रवासात प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरूख सैफी याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त होत आहे. त्याला रेल्वेचा पूर्ण डबाच पेटवून द्यायचा होता, अशीही माहिती आता समोर येत आहे. केरळमधील घटनेनंतर सैफी पसार झाला होता. त्यानंतर त्याला रत्नागिरी पोलिस व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तरित्या कारवाई करत ४ एप्रिल २०२३ रोजी रात्री रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर महाराष्ट्र एटीएस पथकाने सैफी याची चौकशी केली असता ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय महाराष्ट्र एटीएसकडून व्यक्त करण्यात आला होता.केरळ पोलिसांसोबतच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या घटनेचा तपास करत आहे. प्राथमिक तपासात सैफी हा दिल्ली येथील शाहीनबाग परिसरातील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच्यावर दहशतवादी विचारसणीचा प्रभाव पडत होता. तसेच त्याला अनुचित प्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे तपासात आढळले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू आहे.दिल्ली येथून तो केरळपर्यंत कसा आला, यांचा शोध पोलिस घेत आहेत. त्याला कोणीतरी केरळ येथे आणले असावेत असा संशय आहे. त्याच्याशी कोण व्यक्ती संपर्कात होत्या, याचाही तपास केला जात आहे. यासाठी त्याचा मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला असून, मागील ६ महिन्यातील कॉल डिटेल्स, व्हॉटसॲप, फेसबुकवरील संभाषण आदींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. आजारामुळे तपासात अडथळेकेरळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सैफी याला काविळचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला कोझीकोडे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास कामात अडथळे निर्माण होत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKeralaकेरळrailwayरेल्वेterroristदहशतवादी