शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वे प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरुखचा दहशतवाद्यांशी संबंध?, पोलिसांनी रत्नागिरीत आवळल्या होत्या मुसक्या

By अरुण आडिवरेकर | Updated: April 12, 2023 12:13 IST

आजारामुळे तपासात अडथळे

रत्नागिरी : केरळ येथे रेल्वे प्रवासात प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरूख सैफी याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त होत आहे. त्याला रेल्वेचा पूर्ण डबाच पेटवून द्यायचा होता, अशीही माहिती आता समोर येत आहे. केरळमधील घटनेनंतर सैफी पसार झाला होता. त्यानंतर त्याला रत्नागिरी पोलिस व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तरित्या कारवाई करत ४ एप्रिल २०२३ रोजी रात्री रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर महाराष्ट्र एटीएस पथकाने सैफी याची चौकशी केली असता ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय महाराष्ट्र एटीएसकडून व्यक्त करण्यात आला होता.केरळ पोलिसांसोबतच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या घटनेचा तपास करत आहे. प्राथमिक तपासात सैफी हा दिल्ली येथील शाहीनबाग परिसरातील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच्यावर दहशतवादी विचारसणीचा प्रभाव पडत होता. तसेच त्याला अनुचित प्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे तपासात आढळले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू आहे.दिल्ली येथून तो केरळपर्यंत कसा आला, यांचा शोध पोलिस घेत आहेत. त्याला कोणीतरी केरळ येथे आणले असावेत असा संशय आहे. त्याच्याशी कोण व्यक्ती संपर्कात होत्या, याचाही तपास केला जात आहे. यासाठी त्याचा मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला असून, मागील ६ महिन्यातील कॉल डिटेल्स, व्हॉटसॲप, फेसबुकवरील संभाषण आदींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. आजारामुळे तपासात अडथळेकेरळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सैफी याला काविळचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला कोझीकोडे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास कामात अडथळे निर्माण होत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKeralaकेरळrailwayरेल्वेterroristदहशतवादी