शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

'ईडीचा तपास सोम्या गोम्याना समजतोच कसा?'; दिपक केसरकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 21:18 IST

दीपक केसरकर यांनी गुरूवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राणेच्या आरोपांचा समाचार घेतला.

सावंतवाडी: केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जर मातोश्रीवरील चार जणांना ईडी लवकरच नोटीस बजावणार असे सांगत असतील, तर हा तपास यंत्रणेचा अपमान असून देशातील सर्वाच्च संस्थाचा तपास सोम्या गोम्याना समजतोच कसा, असा सवाल शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सुशांत सिंग प्रकरणाची फाईल पुन्हा उघडेल सांगायला राणे काय केंद्रीय गृहमंत्री आहेत का असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. केसरकर यांनी गुरूवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राणेच्या आरोपांचा समाचार घेतला.

सध्या महाराष्ट्रात कोणीही उठते आणि राज्य सरकारवर बोलतो जिकडे तिकडे ईडीची भिती घातली जाते हे योग्य नाही तुम्ही जेवढे महाविकास आघाडी तील नेत्यांना त्रास देणार तेवढे हे सरकार आणि पेटून उठेल. ईडी वैगरे या तपास यंत्रणा देशातील सर्वाच्च आहेत त्याचा गैरवापर होत असून सामान्य माणूस पण हे जाणून आहे त्यामुळे प्रत्येकाने ओळखले पाहिजे लोकशाहीत जनता महत्वाची असून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ही पराभूत व्हावे लागले होते.असेही आमदार केसरकर यावेळी म्हणाले.

राणे यांनी मातोश्री वरच्या चौघांना लवकरच ईडी  नोटीस बजावेल असे म्हटले आहे यावरही केसरकर यांनी भाजप ला सल्ला दिला भाजपचे विचार आम्हाला समविचारी वाटायचे पण पण राणे सारखे नेते पक्षात घेऊन भाजप वेगळ्याच दिशेला वाहत जाऊ लागला आहे जेथे राणे तेथील सत्ता जाते हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लक्षात ठेवावे राणेंना सुधारण्याची संधी होती पण ते सुधारू शकत नाही संजय राऊत यांनी राणेवर आरोप केले नव्हते तरीही ते पुढे का आले असा सवाल ही केसरकर यांनी यावेळी करत सोम्या गोम्याना ईडी च्या कारवाया समजत असतील तर तपास यंत्रणेचे महत्व कुठे राहणार असा सवाल ही उपस्थीत केला.

सुशांत सिग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार असे राणे यांनी सांगायला ते काय केंद्रीय गृहमंत्री आहेत का? आणि सीबीआय ने अद्याप पर्यंत या तपासाची फाईल बंद केली नाही मग आणि कशी उघडणार काय फक्त बदनामीचा प्रकार सुरू आहे.या देशात अद्याप उच्च व सर्वाच्च न्यायालये आहेत एवढे लक्ष ठेवा जनता तुम्हाला कधी तरी जाब विचारेल त्यामुळेच उत्तर प्रदेश सारख्या राज्यात एक युवा नेतृत्व ही तुमची झोप उडवत असल्याचे केसरकर हे भाजप ला उद्देशून म्हणाले.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा