शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

एलईडी मच्छीमार नौका तत्काळ जप्त करा, मंत्री नितेश राणेंनी दिले आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:36 IST

अनधिकृत गोष्टीत मदत करणाऱ्या अधिकाऱ्याचीही गय नाही

रत्नागिरी : सागरी सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने पर्ससीन मच्छीमार, किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे, देशद्रोही कारवाया, यावर बारीक लक्ष राहणार आहे. इथल्या मच्छीमारांचे नुकसान होऊ नये, यासाठी एलईडी मच्छीमार नाैकांवर तत्काळ कारवाई करून त्या जप्त करण्याचे आदेश मत्स्य विभागाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.रत्नागिरी जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आलेले मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाचा आढावा घेतला. बैठक झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या आढावासंदर्भात त्यांनी विश्रामगृह येथे पत्रकारांना माहिती दिली.ते म्हणाले, देशात येत्या काळात मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, देश या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर कसा जाईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत मत्स्य उत्पादन जास्तीत जास्त वाढविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी काही कार्यक्रम आखण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सागरी सुरक्षा महत्त्वाची आहे. हा विभाग माझ्याकडे असल्याने त्याविषयी १०० टक्के अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्या विभागाची आहे. या विभागात पारदर्शकता यावी, मत्स्य उत्पादन वाढावे, बंदरांचा विकास व्हावा आणि मच्छीमारीचे प्रमाण वाढावे, यादृष्टीने या बैठकीत आढावा घेतल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.बंदरांचा विकास मत्स्य उत्पादन वाढविणे आणि सागरी सुरक्षा यादृष्टीने केला जात आहे. त्यासाठी दोन्ही सरकारची गुंतवणूक आहे. पण, या बंदरांचा किंवा किनारपट्टींचा उपयोग कुणी देशाच्या विरोधात करू नये. याबाबतची माहिती आली होती, ती संबंधित विभागाकडे चाैकशीसाठी देण्यात आल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या खात्याच्या माध्यमातून शिस्त लावणे हे आमचे काम आहे. नियमाच्या बाहेर एकही गोष्ट होणार नाही. अनधिकृत गोष्टींवर कारवाई होईलच, पण त्याला जो अधिकारी मदत करेल, त्यालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

स्टीलची गस्ती नाैका

सध्या एकच गस्ती नाैका आहे. त्यामुळे नवीन स्टीलची गस्तीनाैका घेण्याचा निर्णय झाला आहे. ड्रोनमुळे आता कारवाया सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. रत्नागिरीत सध्या बांगलादेशी आढळत आहेत, त्याबाबतही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitesh Raneनीतेश राणे fishermanमच्छीमार