शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बीज अंकूरे अंकुरे.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST

कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात? हे शीर्षकगीत असलेल्या मालिकेला आता अनेक वर्षे झाली असली तरीही हे शीर्षकगीत अजूनही मनाला ...

कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात?

हे शीर्षकगीत असलेल्या मालिकेला आता अनेक वर्षे झाली असली तरीही हे शीर्षकगीत अजूनही मनाला भुरळ घालतं - ते त्याच्या गोडव्यामुळे आणि त्यातील भावार्थामुळे. म्हणूनच हे गीत अजृूनही मनात रुंजी घालून आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेली ‘गोट्या’ ही मराठी मालिका लोकप्रिय झाली होती. केवळ लहानच नव्हे, तर अगदी मोठ्यांनाही ही मालिका पाहताना भान विसरायला लावत होती. यातील प्रमुख भूमिका असलेल्या गोट्या म्हणजे जाॅय घाणेकर या मुलाचा यात अभिनय मनाला सातत्याने भावणारा होता. त्याचबरोबर त्याची लहान बहीण असलेली सुमा हिच्यासह सर्व बालकलाकारांचे अभिनय त्या मालिकेला साजेसे असेच होते. या मालिकेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, साखरपा या ठिकाणांचे संदर्भ अधूनमधून येत असल्याने ही मालिका पाहताना अधिक जवळची वाटत होती, हे सांगायलाच नको. अशी ही मालिका सध्या तरी काळाच्या पडद्याआड गेली होती. सध्या सर्वच वाहिन्यांवर मालिकांचे पेवच जणू फुटले आहे. सध्या सुरू असलेल्या अनेक मालिका दर दिवशी आवर्जून बघितल्या जातात. महिलांच्याच नव्हे तर अगदी पुरुषमंडळीही कार्यालये, मित्रपरिवारांमध्ये या मालिकांच्या, त्यातील पात्रांच्या उत्साहाने चर्चा करताना दिसतात. ती मालिका संपली की, मग काही महिन्यातच ती मालिका ‘आऊट डेटेड’ होते. तसं पाहिलं तर आताच्या बहुतांशी मालिकांचा ढाचा तोच असतो. त्यामुळे कुठल्या मालिकेचे कथानक काय होते, हे आठवणे अवघड.

तर, गोट्या या मालिकेची आठवण येण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ही मालिका यूट्युबवर दिसली. या मालिकेत छोटेखानी भूमिका असलेल्या आणि कोकणच्या सुकन्या असलेल्या, मराठी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी काही वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या या गोट्या मालिकेचे सर्व भाग एकत्र करून ते यूट्युबवर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ज्यांना ज्यांना ही मालिका आवडत होती, त्यांना आता पुन्हा ही मालिका यावर उपलब्ध झाली आहे.

जुन्या काळातही विज्ञान आणि संस्कार यांची उत्तम सांगड या मालिकेत पाहायला मिळते. मुलांना घडविताना ‘मना घडवी संस्कार’ याचे भान ठेवून मुलांच्या मनावर कसे संस्कार करावेत, हे या मालिकेतून उत्तमरीत्या दाखविले होते. ‘गोट्या’ मालिका पाहताना गोट्याच्या भाबडेपणामुळे कधी मनसोक्त हसायला येते, तर कधी डोळ्यांच्या कडाही पाणावतात. जुन्या काळचे ग्रामीण जीवन पाहताना मन गुुंगून जाते.

सध्या बदललेली जीवनशैली पाहताना गोट्या बाळबोध वळणाचा वाटतो. गोट्या काय किंवा त्याची लहान बहीण सुमा काय, त्यांच्या तोंडी घालण्यात आलेली वाक्ये आताच्या काळालाही अंतर्मुख व्हायला लावतात. एखाद्या घटनेची मीमांसा करताना ती वैज्ञानिक निकषावर ही मुले तपासू पाहतात. त्यांचा बालबुद्धीतील चाैकसपणाही मोठ्यांना निरुत्तर करतो, हे या मालिकेत दिसते. म्हणूनच ज्या पालकांना आपल्या मुलांच्या मनावर खऱ्या अर्थाने सुसंस्कारित करायचे आहे, त्यांनी ही मालिका आपल्या मुलांना दाखवतानाच स्वत:ही पाहायला हवी, अशीच होती.

सध्या सुरू असलेल्या मालिकांमधून कुठले संस्कार होतायत, हे शोधणे म्हणजे स्वतंत्र संशोधनाचा विषय म्हणावा लागेल. या मालिकांनी स्वत:ची वेगळीच संस्कृती दाखवायला सुरुवात केलीय, ती मुलांसाठीही हानिकारक आहे, हे माहीत असूनही घरातील ज्येष्ठ मंडळी त्यात रमतात, हे दुर्दैव!