शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

बीज अंकूरे अंकुरे.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST

कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात? हे शीर्षकगीत असलेल्या मालिकेला आता अनेक वर्षे झाली असली तरीही हे शीर्षकगीत अजूनही मनाला ...

कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात?

हे शीर्षकगीत असलेल्या मालिकेला आता अनेक वर्षे झाली असली तरीही हे शीर्षकगीत अजूनही मनाला भुरळ घालतं - ते त्याच्या गोडव्यामुळे आणि त्यातील भावार्थामुळे. म्हणूनच हे गीत अजृूनही मनात रुंजी घालून आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेली ‘गोट्या’ ही मराठी मालिका लोकप्रिय झाली होती. केवळ लहानच नव्हे, तर अगदी मोठ्यांनाही ही मालिका पाहताना भान विसरायला लावत होती. यातील प्रमुख भूमिका असलेल्या गोट्या म्हणजे जाॅय घाणेकर या मुलाचा यात अभिनय मनाला सातत्याने भावणारा होता. त्याचबरोबर त्याची लहान बहीण असलेली सुमा हिच्यासह सर्व बालकलाकारांचे अभिनय त्या मालिकेला साजेसे असेच होते. या मालिकेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, साखरपा या ठिकाणांचे संदर्भ अधूनमधून येत असल्याने ही मालिका पाहताना अधिक जवळची वाटत होती, हे सांगायलाच नको. अशी ही मालिका सध्या तरी काळाच्या पडद्याआड गेली होती. सध्या सर्वच वाहिन्यांवर मालिकांचे पेवच जणू फुटले आहे. सध्या सुरू असलेल्या अनेक मालिका दर दिवशी आवर्जून बघितल्या जातात. महिलांच्याच नव्हे तर अगदी पुरुषमंडळीही कार्यालये, मित्रपरिवारांमध्ये या मालिकांच्या, त्यातील पात्रांच्या उत्साहाने चर्चा करताना दिसतात. ती मालिका संपली की, मग काही महिन्यातच ती मालिका ‘आऊट डेटेड’ होते. तसं पाहिलं तर आताच्या बहुतांशी मालिकांचा ढाचा तोच असतो. त्यामुळे कुठल्या मालिकेचे कथानक काय होते, हे आठवणे अवघड.

तर, गोट्या या मालिकेची आठवण येण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ही मालिका यूट्युबवर दिसली. या मालिकेत छोटेखानी भूमिका असलेल्या आणि कोकणच्या सुकन्या असलेल्या, मराठी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी काही वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या या गोट्या मालिकेचे सर्व भाग एकत्र करून ते यूट्युबवर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ज्यांना ज्यांना ही मालिका आवडत होती, त्यांना आता पुन्हा ही मालिका यावर उपलब्ध झाली आहे.

जुन्या काळातही विज्ञान आणि संस्कार यांची उत्तम सांगड या मालिकेत पाहायला मिळते. मुलांना घडविताना ‘मना घडवी संस्कार’ याचे भान ठेवून मुलांच्या मनावर कसे संस्कार करावेत, हे या मालिकेतून उत्तमरीत्या दाखविले होते. ‘गोट्या’ मालिका पाहताना गोट्याच्या भाबडेपणामुळे कधी मनसोक्त हसायला येते, तर कधी डोळ्यांच्या कडाही पाणावतात. जुन्या काळचे ग्रामीण जीवन पाहताना मन गुुंगून जाते.

सध्या बदललेली जीवनशैली पाहताना गोट्या बाळबोध वळणाचा वाटतो. गोट्या काय किंवा त्याची लहान बहीण सुमा काय, त्यांच्या तोंडी घालण्यात आलेली वाक्ये आताच्या काळालाही अंतर्मुख व्हायला लावतात. एखाद्या घटनेची मीमांसा करताना ती वैज्ञानिक निकषावर ही मुले तपासू पाहतात. त्यांचा बालबुद्धीतील चाैकसपणाही मोठ्यांना निरुत्तर करतो, हे या मालिकेत दिसते. म्हणूनच ज्या पालकांना आपल्या मुलांच्या मनावर खऱ्या अर्थाने सुसंस्कारित करायचे आहे, त्यांनी ही मालिका आपल्या मुलांना दाखवतानाच स्वत:ही पाहायला हवी, अशीच होती.

सध्या सुरू असलेल्या मालिकांमधून कुठले संस्कार होतायत, हे शोधणे म्हणजे स्वतंत्र संशोधनाचा विषय म्हणावा लागेल. या मालिकांनी स्वत:ची वेगळीच संस्कृती दाखवायला सुरुवात केलीय, ती मुलांसाठीही हानिकारक आहे, हे माहीत असूनही घरातील ज्येष्ठ मंडळी त्यात रमतात, हे दुर्दैव!