शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचा तडाखा वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात अडीच हजार अधिक रुग्ण सापडले असून, १५ दिवसांत तब्बल ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पन्नाशीच्या वरील वयाच्या रुग्णांचा अधिक समावेश आहे. दुबईहून शृंगारतळी (ता. गुहागर) येथे आलेली व्यक्ती १८ मार्च, २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. हा रुग्ण जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण ठरला होता. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयात ८ एप्रिल, २०२० रोजी कोरोना रुग्णाने अखेरचा श्वास घेतला होता. तो रुग्ण जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला असून, तो अलसुरे (ता. खेड) गावातील होता.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असून, या निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. एप्रिल महिन्यामध्ये तर कोरोनाचा कहर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू झाला आहे.

एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्यांना कोणतीच लक्षणे नाहीत, अशा लोकांकडून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. एप्रिलच्या १५ दिवसांत जिल्ह्यात २,५९२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून कोरोनाबाधितांची संख्या १३,६२१ झाली आहे. आतापर्यंत १०,०१५ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या आता ४१५ झाली असून त्यांचे प्रमाण ३.४ टक्के आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याआधी रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात १३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये ५२ रुग्ण दगावले. मात्र त्यानंतर मृतांच्या संख्येत चांगली घट झाली. नोव्हेंबर २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत हे प्रमाण मर्यादित होते. मात्र एप्रिल महिन्यात हे प्रमाण खूपच वाढले आहे.

लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी त्यातून धोका खूप कमी होतो. मात्र अजूनही लसीकरणाची गती वाढलेली नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येवर अजून मर्यादा आलेली नाही. हीच बाब आरोग्य विभागासाठी अधिक चिंतेची आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची प्रत्येक महिन्यातील संख्या -

महिना रुग्णांच्या मृत्यूची संख्या

एप्रिल, २०२० ०१

मे २०२० ०९

जून २०२० १६

जुलै २०२० ३५

सप्टेंबर २०२० १३०

ऑक्टोबर २०२० ५२

नोव्हेंबर २०२० ०३

डिसेंबर २०२० ०९

जानेवारी २०२१ २१

फेब्रुवारी २०२१ १६

मार्च २०२१ ११

१५ एप्रिल २०२१ ३९

तालुकानिहाय कोरोना मृतांची संख्या -

रत्नागिरी १०६

खेड ६१

गुहागर १४

दापोली ४७

चिपळूण ९८

संगमेश्वर ४७

लांजा १५

राजापूर २१

मंडणगड ०६