शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
2
Thane Municipal Corporation Election 2026 : ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचा तिसरा नगरसेवक बिनविरोध विजयी
3
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
4
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
5
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
6
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
7
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
8
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
9
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
10
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
11
जय श्रीराम! अयोध्येत महासागर, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ लाख भाविकांनी घेतले रामलला दर्शन
12
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
13
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
14
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
15
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
16
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
17
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
18
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
19
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
20
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचा तडाखा वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. वर्षभराच्या कालावधीत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून, एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात अडीच हजार अधिक रुग्ण सापडले असून, १५ दिवसांत तब्बल ३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पन्नाशीच्या वरील वयाच्या रुग्णांचा अधिक समावेश आहे. दुबईहून शृंगारतळी (ता. गुहागर) येथे आलेली व्यक्ती १८ मार्च, २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. हा रुग्ण जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण ठरला होता. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयात ८ एप्रिल, २०२० रोजी कोरोना रुग्णाने अखेरचा श्वास घेतला होता. तो रुग्ण जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला असून, तो अलसुरे (ता. खेड) गावातील होता.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असून, या निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. एप्रिल महिन्यामध्ये तर कोरोनाचा कहर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू झाला आहे.

एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्यांना कोणतीच लक्षणे नाहीत, अशा लोकांकडून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. एप्रिलच्या १५ दिवसांत जिल्ह्यात २,५९२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून कोरोनाबाधितांची संख्या १३,६२१ झाली आहे. आतापर्यंत १०,०१५ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या आता ४१५ झाली असून त्यांचे प्रमाण ३.४ टक्के आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याआधी रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात १३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये ५२ रुग्ण दगावले. मात्र त्यानंतर मृतांच्या संख्येत चांगली घट झाली. नोव्हेंबर २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत हे प्रमाण मर्यादित होते. मात्र एप्रिल महिन्यात हे प्रमाण खूपच वाढले आहे.

लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी त्यातून धोका खूप कमी होतो. मात्र अजूनही लसीकरणाची गती वाढलेली नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येवर अजून मर्यादा आलेली नाही. हीच बाब आरोग्य विभागासाठी अधिक चिंतेची आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची प्रत्येक महिन्यातील संख्या -

महिना रुग्णांच्या मृत्यूची संख्या

एप्रिल, २०२० ०१

मे २०२० ०९

जून २०२० १६

जुलै २०२० ३५

सप्टेंबर २०२० १३०

ऑक्टोबर २०२० ५२

नोव्हेंबर २०२० ०३

डिसेंबर २०२० ०९

जानेवारी २०२१ २१

फेब्रुवारी २०२१ १६

मार्च २०२१ ११

१५ एप्रिल २०२१ ३९

तालुकानिहाय कोरोना मृतांची संख्या -

रत्नागिरी १०६

खेड ६१

गुहागर १४

दापोली ४७

चिपळूण ९८

संगमेश्वर ४७

लांजा १५

राजापूर २१

मंडणगड ०६