शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

अस्मानी संकटाचा दुसरा फटकाही मजबूत, आधी अतिवृष्टीने हिरावून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:42 IST

वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले भातपीक परतीच्या पावसाने मातीमोल केले. त्यात तालुक्यातील ३० टक्क्यांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआधी अतिवृष्टीने हिरावून नेले, वादळसदृश पावसाने आणखी घाव घातलेशेतकऱ्यांची व्यथा अधिकच गडद

सचित मोहितेदेवरूख : वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले भातपीक परतीच्या पावसाने मातीमोल केले. त्यात तालुक्यातील ३० टक्क्यांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाले आहे.यावर्षी कोकणात चांगला पाऊस बरसला होता. त्यामुळे भाताचे पीक चांगले मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये संततधार कोसळलेल्या पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले. यानंतर भातशेती कापणीच्या ऐन हंगामात संगमेश्वर तालुक्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे अपरिमित नुकसान झाले आहे.

शेतकरी शेतावर वर्षभर राबत असतो. अपार कष्ट करुन घाम गाळून तो शेती पिकवितो आणि जेव्हा तयार झालेली शेती पिवळी धमक सोनेरी होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. मात्र, याच्या उलट जेव्हा परिस्थिती ओढवते. तेव्हा हाच शेतकरी हबकून जातो. मात्र, तरीही तो हिंमत हरत नाही.

कुजलेल्या अवस्थेतीलदेखील भाताचा एक एक दाणा निवडून घरी आणण्याचा प्रयत्न करतो. यावेळी शेतकऱ्यांच्या घामाबरोबरच डोळ्यांतून अश्रू देखील ओघळले जातात आणि म्हणूनच जेव्हा वर्षभर केलेल्या श्रमाचे चीज होत नाही तेव्हा शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने भरीव मदतीची गरज असते. अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकरी वर्गामधून तालुक्यातून उमटत आहे.संगमेश्वर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आहे. साखरप्याच्या टोकापासून ते आरवलीपर्यंत वसलेला आहे. या तालुक्यातील बोंड्ये, मारळ, निवे, खडीकोळवण, साखरपा, कोंडगाव, वांझोळे, बामणोली, आंगवली, मुरादपूर, हातीव, देवरुख, कोसुंब, करंबेळे, तेºहे, माभळे, बावनदी, परचुरी, कोळंबे, माखजन दशक्रोशी, कसबा, पंचक्रोशी आदी गावांमधील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

पाऊस, ढगाळ वातावरण आणि क्यार वादळ अशा तिहेरी संकटात भातपीक सापडले. त्यामुळे उभे असलेले पीक काही दिवसांपूर्वी आलेल्या क्यार वादळात भुईसपाट झाले. जोडीला पावसाची रिपरित असल्याने शेतात पडलेल्या भाताला कोंब येण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर काही ठिकाणी भात पूर्णत: कुजले आहे.विविध संघटना आणि वृत्तपत्रातून जोरदार मागणी झाल्यानंतर शासनाने दखल घेतली आणि पंचनामे सुरू झाले. काही गावांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, अनेक गावांतून भातशेती कुजलेल्या अवस्थेत असतानाही कापण्यात आली होती. जे काही मिळेल ते भात हाती यावे, अशा विचाराने ते कापण्यात आले. मात्र अशा शेतीच्या नुकसानाचे पंचनामे केले नसल्याचे अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत.कापलेल्या शेतीचेही होणार पंचनामेनुकसान झालेली शेती कापली असेल आणि अशा शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्र आपल्या गावातील पंचनामा करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, कृषीपर्यवेक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले तरीही पंचनामे केले जातील, असेही नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. याबरोबरच ज्या शेतकऱ्यांचे शेतीच्या नुकसानाचे पंचनामे झाले नसतील, अशा शेतकऱ्यांनी देवरूख तहसीलदार कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी (०२३५४) २६००२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार सुहास थोरात यांनी केले आहे.कसणाऱ्याला भरपाई मिळावीतालुक्यातील अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती कसताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेली जमीन कसण्याची परंपरा अनेक ठिकाणी अजूनही सुरू आहे. मात्र, भरपाई मिळते जमीन मालकांना. जमीन कसणाऱ्याला भरपाई मिळावी, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.संगमेश्वर तालुक्यात एकूण १९६ इतकी गावे आहेत. ११ हजार ६१३ हेक्टर आर इतके क्षेत्र लागवडीखालील असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. या ११,६१३ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ३५५.५५ हेक्टर क्षेत्र सध्या बाधित झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात आहे, तर ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या पुरामुळे २६०.७९ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. सोमवारपर्यंत ५,२५९ शेतकऱ्यांचे १०५९.५३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी