शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ज्ञानमंदिराची दुरावस्था, लांजातील विद्यार्थ्यांवर पटांगणात बसवून शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 14:39 IST

अनिल कासारे लांजा : भावी पिढी घडविणारे ज्ञानमंदिरच आता माेडकळीला आल्याचा धक्कादायक प्रकार लांजा तालुक्यातील विलवडे येथील शाळा नं. ...

अनिल कासारे लांजा : भावी पिढी घडविणारे ज्ञानमंदिरच आता माेडकळीला आल्याचा धक्कादायक प्रकार लांजा तालुक्यातील विलवडे येथील शाळा नं. २ येथे समाेर आला आहे. त्या शाळेत मुलांना शिकवणे धाेकादायक असल्याने शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांना बसवून शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ आली आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे काेठे, असा प्रश्न आता पडला आहे.

शासनाने १ डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील शाळेचे छत सुरक्षित आहे की नाही, याची खातरजमा न केल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर शाळेच्या बाहेर बसण्याची वेळ आली आहे.

तालुक्यातील विलवडे शाळा नं. २ ही शाळा पहिली ते चाैथीपर्यंत असून, याठिकाणी १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत ३ वर्षापासून मोडकळीला आली आहे. शाळा व्यवस्थापन समिती शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून पाठपुरावा करत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षामध्ये शासनाने किंवा येथील लोकप्रतिनिधींनी शाळा दुरुस्ती गांभीर्याने घेतलेली नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक शाळेत येताच त्यांनी शाळेची दुरवस्था पाहिली. त्यानंतर त्यांनी मुलांना शाळेच्या पटांगणात शिकविण्यास सुरूवात केली.

शाळेचा निधी गेला कुठे?

विलवडे शाळा नं . २ कोसळण्याच्या स्थितीमध्ये असताना या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. या शाळेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचा आरोप येथील पालकांनी केला आहे. ही वस्तुस्थिती असेल तर, मग हा निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संपूर्ण शाळा इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. मुले बसू शकत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे आपण गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे शाळा दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यावरूनच प्रशासनाचा आडमुठेपणा दिसून येतो. - सुरेंद्र खामकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाStudentविद्यार्थी