शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

Satara Bus Accident : दैव बलवत्तर होते म्हणून वाचलो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 13:29 IST

Satara Bus Accident : शनिवारी सकाळी 11.30 वाजता फोन आला व अपघाताची माहिती मिळताच हादरा बसला.

रत्नागिरी :  दरवर्षी पावसाळी सहल काढण्यात येते. आठवडाभरापूर्वीच वर्षा सहलीचं नियोजन सुरू होतं. सुरूवातीपासूनच माझं सहलीला जायचं अथवा नाही, हे पक्कं ठरत नव्हतं. काम असल्यामुळे जायचं नाही परंतु एकीकडे मित्रांसोबत जायचं, असं वाटत होतं. शुक्रवारी सायंकाळीदेखील मला मित्रांचा फोन आला, चल म्हणून. पण अखेर मी नाही म्हणून सांगितलं. त्यानंतर शनिवारी सकाळी 11.30 वाजता फोन आला व अपघाताची माहिती मिळताच हादरा बसला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आपण वाचलो, याचा प्रत्यय आल्याची माहिती  कोकण कृषी विद्यापिठातील वरिष्ठ लिपीक संतोष महादेव पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सर्व मित्रमंडळी मजेत सहलीला निघाली होती. आठवडाभर सहलीचे नियोजन झाले होते. सकाळी ७ वाजता मंडळींची गाडी सुटली होती. मात्र, 11.30 वाजता गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी माझ्यासमवेत असलेल्या सर्व सहकारी कर्मचाºयांना हादराच बसला. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.  सहलीला गेलेल्यांच्या नातेवाईकांना काय सांगावे, हादेखील प्रश्न होता. अपघाताच्या वृतानंतर विद्यापिठातील कर्मचारी एकत्र आलो. 15 ते 20 गाड्या करून तातडीने अपघातस्थळी दुपारी 2 वाजता पोहोचलो. अपघाताचे ठिकाण पाहूनच हादरा बसला. 

अपघातातील विनायक सावंत (फोंडा) व दत्तात्रय रायगुडे (खंडाळा-सातारा) येथील आहेत. उर्वरित सर्वजण स्थानिक आहेत. अपघातात वाचलेले प्रकाश सावंतदेसाई यांची आम्ही भेट घेतली. सुमारे 400 फूट खाली बस कोसळल्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.  पोलादपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत असले तरी मित्रांचे मृतदेह पाहून अश्रू थांबत नव्हते. 

पत्नीची श्रद्धा फळाला आली...

माझी पत्नी दर रविवारी बैठकीला जाते. शिवाय माझी अन्य काही कामे होती. त्यामुळे नाईलाजाने अखेर सहलीला येण्यास मित्रांना नकार दिला. परंतु, अपघाताचे वृत्त ऐकताच माझ्या पत्नीची श्रध्दा तसेच दैवकृपेने आपण वाचलो, असे राहूनराहून वाटत असले तरी आपण चांगल्या सहकाºयांना गमावल्याचे दु:ख मोठे आहे. शिवाय सहकारी मित्रांची कुटुंब उद्ध्वस्त झाली असून, त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन कोणत्या शब्दात करावे, हेच कळत नाही, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातDeathमृत्यू