शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

शिक्षणाच्या प्रबळ इच्छेने सरपंचबाई झाल्या दहावी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:26 IST

आपले सहकारी शिक्षित आणि आपले शिक्षण कमी याचे शल्य टोचत राहिल्याने त्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. काैटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी परीक्षा दिली आणि ५२ टक्के गुणही मिळविले.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : शिक्षणाची ओढ आणि आवड असेल तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसतेच, हे दाखवून दिले आहे भातगाव (ता. रत्नागिरी) येथील सरपंच रेणुका सागर आग्रे यांनी. आपले सहकारी शिक्षित आणि आपले शिक्षण कमी याचे शल्य टोचत राहिल्याने त्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. काैटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी परीक्षा दिली आणि ५२ टक्के गुणही मिळविले.काैटुंबिक जबाबदारी व परिस्थितीमुळे रेणुका यांना २००३ साली सातवीनंतर शिक्षण थांबवावे लागले. २०११ साली भातगाव गोळेवाडी येथील सागर महादेव आग्रे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतरही त्या कुटुंबाच्या जबाबदारीत व्यस्त झाल्या. पतीचा रंगकामाचा व्यवसाय. त्यांना एक मुलगा व एक मुलगी, सासू, सासरे व पती मिळून त्यांच्या कुटुंबात एकूण सहा व्यक्ती आहेत. सहाजणांचे कुटुंब तसेच घरची शेती, त्यामुळे पहाटे ४ वाजल्यापासून दिनक्रम सुरू होतो.भातगाव ग्रामपंचायतीच्या २०२१ साली निवडणुकीत त्या सरपंचपदी विराजमान झाल्या. गावाच्या प्रथम नागरिकाचा सन्मान प्राप्त झाला असला तरी सोबतचे सहकारी शिक्षित आहेत. गावाचा कारभार चालवायचा म्हटलं तर आपणही शिकले पाहिजे, असे राहून राहून वाटायला लागले. त्यांनी पती सागर व सासरे महादेव यांचेकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करून पाठिंबा दिला.पतीसाेबत मिरजोळी हायस्कूल येथे १७ नंबरचा फाॅर्म भरला. दर शनिवारी त्यांना शाळेत जावे लागे. शाळेतून आल्यावर त्यांना आठवडाभराचा दिलेला गृहपाठ, अभ्यास न चुकता पूर्ण करावा लागे. लहान मुले व कुटुंबातील अन्य घटकांमुळे स्वयंपाकापासून अन्य सर्व कामे आटोपून अभ्यासाला बसावे लागे. घरातील कामे, ग्रामपंचायतीची जबाबदारी यामुळे रात्री ११ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत त्या अभ्यासाला वेळ देत. परीक्षेला आबलोली केंद्र आले आणि केंद्रावर साेडणे-आणणे यासाठी पतीची मदत झाली. आता त्यांनी पुढे बारावी करून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsarpanchसरपंचexamपरीक्षा