शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वर तालुक्यात घरातच भरतेय शाळा!

By admin | Updated: October 2, 2014 00:27 IST

शिक्षण विभाग : धोकादायक इमारत असल्याने आली वेळ

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील दख्खन गावातील आदर्श प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनली असून, अखेरची घटका मोजत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गावातीलच एका ग्रामस्थाच्या घरात सध्या हे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीला दख्खन शाळा एका घरात भरत आहे.रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपानजीक दख्खन गाव आहे. गावामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी प्राथमिक शाळा आहे. या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. शाळेची इमारत १९६१ साली बांधण्यात आली होती. शाळेमध्ये एकूण तीन वर्गखोल्या असून, मधल्या वर्गखोलीचे वासे मोडल्यामुळे ही वर्गखोली छपराअभावी आहे.तसेच भिंतीनासुद्धा मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना या शाळेत शिक्षणासाठी पाठवणे धोकादायक असल्यामुळे गावातील ग्रामस्थांनीच एका घरामध्ये शाळा भरवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार सद्यस्थितीला रघुनाथ दत्ताराम गुरव यांच्या घरात शाळा भरत असून, सुमारे २५ विद्यार्थी या घरात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.रघुनाथ गुरव यांच्या घराच्या पडवीमध्ये इयत्ता पहिली व तिसरी, तर आतील खोलीत इयत्ता दुसरी व चौथीचे विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी बसवले जात आहेत. शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनल्याने ती केव्हाही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे शाळेच्या नवीन इमारतीसाठी मंजुरी मिळावी, यासाठी शाळेच्यावतीने ३० डिसेंबर २०१३ रोजी संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला. यानंतर कोणतीच कार्यवाही न झाल्याने पुन्हा २७ जून २०१४ रोजी फेरप्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा विचार संबंधित विभाग करतो का, हे पाहावे लागणार आहे. नवीन इमारतीसाठी सर्व शिक्षा अभियानातून निधी दिला जात नसल्याचे समजते. त्यामुळे या शाळेच्या नवीन इमारतीला निधी मिळण्याकरिता जिल्हा नियोजन समितीवरच सारे काही अवलंबून आहे. दुसरीकडे विद्यार्थी घरात शिक्षण घेत असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची परवड होत आहे. ही परवड थांबावी व शाळेच्या नवीन इमारतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)आदर्श शाळा पुरस्कार पटकावणारी ही शाळा असतानाही त्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. शिक्षण विभागाने या शाळेच्या दुरवस्थेकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही. छपराअभावी वर्गखोली असतानाही ग्रामस्थांनी सोय केली म्हणून नुकसान टळले. अन्यथा शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडेही पाहिले नसते, अशीच प्रतिक्रिया आता सामान्यांमधून व्यक्त होत आहे.शिक्षणाची ऐशीतैशी