शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

संगमेश्वर तालुक्यात घरातच भरतेय शाळा!

By admin | Updated: October 2, 2014 00:27 IST

शिक्षण विभाग : धोकादायक इमारत असल्याने आली वेळ

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील दख्खन गावातील आदर्श प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनली असून, अखेरची घटका मोजत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गावातीलच एका ग्रामस्थाच्या घरात सध्या हे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीला दख्खन शाळा एका घरात भरत आहे.रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपानजीक दख्खन गाव आहे. गावामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी प्राथमिक शाळा आहे. या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. शाळेची इमारत १९६१ साली बांधण्यात आली होती. शाळेमध्ये एकूण तीन वर्गखोल्या असून, मधल्या वर्गखोलीचे वासे मोडल्यामुळे ही वर्गखोली छपराअभावी आहे.तसेच भिंतीनासुद्धा मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना या शाळेत शिक्षणासाठी पाठवणे धोकादायक असल्यामुळे गावातील ग्रामस्थांनीच एका घरामध्ये शाळा भरवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार सद्यस्थितीला रघुनाथ दत्ताराम गुरव यांच्या घरात शाळा भरत असून, सुमारे २५ विद्यार्थी या घरात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.रघुनाथ गुरव यांच्या घराच्या पडवीमध्ये इयत्ता पहिली व तिसरी, तर आतील खोलीत इयत्ता दुसरी व चौथीचे विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी बसवले जात आहेत. शाळेची इमारत अत्यंत धोकादायक बनल्याने ती केव्हाही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे शाळेच्या नवीन इमारतीसाठी मंजुरी मिळावी, यासाठी शाळेच्यावतीने ३० डिसेंबर २०१३ रोजी संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला. यानंतर कोणतीच कार्यवाही न झाल्याने पुन्हा २७ जून २०१४ रोजी फेरप्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा विचार संबंधित विभाग करतो का, हे पाहावे लागणार आहे. नवीन इमारतीसाठी सर्व शिक्षा अभियानातून निधी दिला जात नसल्याचे समजते. त्यामुळे या शाळेच्या नवीन इमारतीला निधी मिळण्याकरिता जिल्हा नियोजन समितीवरच सारे काही अवलंबून आहे. दुसरीकडे विद्यार्थी घरात शिक्षण घेत असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची परवड होत आहे. ही परवड थांबावी व शाळेच्या नवीन इमारतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)आदर्श शाळा पुरस्कार पटकावणारी ही शाळा असतानाही त्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. शिक्षण विभागाने या शाळेच्या दुरवस्थेकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही. छपराअभावी वर्गखोली असतानाही ग्रामस्थांनी सोय केली म्हणून नुकसान टळले. अन्यथा शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडेही पाहिले नसते, अशीच प्रतिक्रिया आता सामान्यांमधून व्यक्त होत आहे.शिक्षणाची ऐशीतैशी