शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
2
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
3
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
4
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
5
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
6
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
7
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
8
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
9
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
10
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
11
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
12
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
13
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
14
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
15
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
16
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
17
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
18
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!

जिल्ह्यात १२,६९५ क्विंटल भाताची शेतकऱ्यांकडून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:36 IST

Farmer Ratnagiri- दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातील १,०७९ शेतकऱ्यांनी १२,६९५.८५ क्विंटल भात विक्री केली आहे. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पैस जमा करण्यात येतात. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६ लाख ३२ हजार ६२२.२० रुपये जमा करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात १२,६९५ क्विंटल भाताची शेतकऱ्यांकडून विक्रीआतापर्यंत ४६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६,३२,६२२ रुपये जमा

रत्नागिरी : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातील १,०७९ शेतकऱ्यांनी १२,६९५.८५ क्विंटल भात विक्री केली आहे. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पैस जमा करण्यात येतात. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६ लाख ३२ हजार ६२२.२० रुपये जमा करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील एकूण १४ केंद्रांवर भात खरेदी सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत भात खरेदी सुरू राहणार आहे. विविध सहकारी सोसायटी, खरेदी-विक्री संघामार्फत भात खरेदी करण्यात येते. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासन ठरवून देईल, त्या दराने शेतमाल खरेदी करण्यात येतो. यावर्षी भातासाठी प्रतिक्विंटल १८६८ रुपये दर देण्यात येत आहे. २०१३-१४मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४,४९८.४६ क्विंटल भाताची खरेदी झाली होती.दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. शेतकरी स्वत:पुरता भात ठेवून अधिकची भात विक्री करत असल्याने भात विक्रीतून चांगले अर्थार्जन प्राप्त होते.

 

यावर्षीही भात खरेदी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यावर विक्रीची रक्कम तत्काळ जमा करण्यात येत आहे.- पी. जे. चिले,अधिकारी, दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, शाखा रत्नागिरी.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी