शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

ST Strike : एस. टी. अत्यावश्यक सेवा, मेस्मा लागू शकतो - परिवहन मंत्री अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:13 IST

एस. टी. ही सर्वसामान्य माणसांसाठी आहे. ती अत्यावश्यक सेवा असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे

रत्नागिरी - एस. टी. ही सर्वसामान्य माणसांसाठी आहे. ती अत्यावश्यक सेवा असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे यासाठी मेस्मा कायदा लावता येऊ शकतो. त्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत सांगितले.कोणी नेता नसल्याने संपकरी कर्मचारी भरकटले आहेत. त्यांचे वकील गुणवंत सदावर्ते त्यांना सांगत आहेत की २० तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होईल. पण ते हे कशाच्या आधारे बोलत आहेत, हे माहिती नाही. त्या दिवशी न्यायालयाला समितीचा अहवाल सादर होईल. निर्णय होणार नाही, असेही मंत्री परब म्हणाले.मंत्री परब आज, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळच्या सुमारास त्यांनी प्रसिध्द गणपतीपुळे येथील श्री गणपतीचे दर्शन घेत गरीब जनतेची नाळ असलेली एसटी लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी गणरायाला साकडे घातले.

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून संप पुकारला आहे. यामुळे एसटीची सेवा पुर्णता कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे प्रवासांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवासांची लुट होत असल्याचे समोर आले आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. तर कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी वारंवार सरकारने आवाहन देखील केले. तरी देखील कर्मचारी एसटी विलिनीकरणाच्या आपल्या मागण्यावर ठाम आहेत. यामुळे पुन्हा एकदा सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परब