शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. बंदचा परिणाम : रत्नागिरी विभागाला ५० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:37 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेला वेतनकरार अमान्य असल्याच्या निषेधार्थ अघोषित पुकारण्यात आलेल्या संपामुळे रत्नागिरी विभागातून १६१५पैकी केवळ ४४४ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. जेमतेम २५ टक्केच फेऱ्या सुटल्या. त्यामुळे दिवसभरात रत्नागिरी विभागाचे ५० लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देएस. टी. बंदचा परिणाम : रत्नागिरी विभागाला ५० लाखांचा फटकाग्रामीण भागातील प्रवाशांचे गाड्याविना हाल

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेला वेतनकरार अमान्य असल्याच्या निषेधार्थ अघोषित पुकारण्यात आलेल्या संपामुळे रत्नागिरी विभागातून १६१५पैकी केवळ ४४४ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. जेमतेम २५ टक्केच फेऱ्या सुटल्या. त्यामुळे दिवसभरात रत्नागिरी विभागाचे ५० लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कामगारासांठी २०१६ - २०२०साठी ४.८४९ कोटी रूपयांची भरघोस वेतनवाढ करून वेतन करार जाहीर केला आहे. वेतन कराराव्दारे एस. टी.च्या एक लाख पाच हजार ६७९ कर्मचाऱ्यांना ३२ ते ४८ टक्क्यांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.नियमित वेतश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्यामुळे किमान ४,६१९ ते कमाल १२,०७१ रूपये इतकी वाढ होणार आहे. पूर्वी पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना ४ वेतनवाढ व तीन वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना २ वेतनवाढ, या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता किमान ४,६१९ ते कमाल ९,१०५ रूपये वाढ होणार आहे.

१ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१८ या कर्मचाऱ्यांच्या २६ महिन्यांच्या थकबाकीची रक्कम १,१९७ कोटी रूपये ४८ समान हप्त्यामध्ये अदा करण्यात येणार आहे. परंतु हा करार अमान्य असल्याच्या निषेधार्थ महामंडळाचे सर्व कर्मचारी अघोषित संप पुकारून उत्स्फूर्तरित्या संपात सहभागी झाले आहेत.

संपाची कोणतीही पूर्वसूचना किंवा निवेदन न देता कर्मचारी संपावर गेल्याने प्रशासनाची गैरसोय झाली. महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेचे कामगार संपात सहभागी झाले नव्हत. त्यामुळे उपस्थित चालक, वाहक व कर्मचाऱ्यांव्दारे प्रशासनाने जमेल तेवढे काम करून प्रशासनाला सहकार्य केले.रत्नागिरी विभागातून दिवसभरात १६१५ फेऱ्या सोडणे अपेक्षित होते. पैकी ४४४ फेऱ्या सोडण्यात आल्या. भरपावसात महामंडळाच्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

संपाची पूर्वसूचना नसल्यामुळे बसस्थानकात प्रवासी अधिक वेळ ताटकळत उपस्थित होते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने खासगी वाहनांना परवानगी दिली आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या बाहेरून खासगी गाड्या सोडण्यात येत होत्या. खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय यामुळे तेजीत झाला.दापोली आगारातून १५७ फेऱ्या दिवसभरात सुटणे आवश्यक होते. पैकी आठच फेऱ्या सोडण्यात आल्या. खेड आगारातून २११ व गुहागर आगारातून ११७ फेऱ्या सुटणे गरजेचे असताना दोन्ही आगारातून एकही फेरी सोडण्यात आलेली नाही. दोन्ही आगारात कडकडीत संप पुकारण्यात आला.चिपळूण आगारात ३०६ फेऱ्या सुटणे आवश्यक असताना अवघी एक फेरी सोडण्यात आली आहे. देवरूख आगारातून १४२ फेऱ्या सोडणे गरजेचे होते पैकी १४ फेऱ्या सोडण्यात आल्या. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातून १८१पैकी ११० फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.

शहरी मार्गावर २१६पैकी १७९ फेऱ्या सोडल्या. लांजा आगारातून १२६ पैकी ११६ फेऱ्या सुटल्या. राजापूर आगारातून ८७ फेऱ्या सुटणे अपेक्षित असताना ११ फेऱ्या सोडण्यात आल्या. मंडणगड आगारातून ७२ पैकी ५ फेऱ्या सोडण्यात आल्या. 

महामंडळाचे कर्मचारी अघोषितरित्या संपात उतरले आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरकारने खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. सेनाप्रणित संघटनेचे चालक - वाहक कामावर असल्याने जिल्हाभरात २५ टक्के फेऱ्या चालविण्यात आल्या. महामंडळाने नवीन भरतीमध्ये चालक कमवाहक नियुक्त केले आहेत. हेदेखील संपात सहभागी झाले. - अनिल मेहतर,विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग

या संपामुळे सरकारने खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. बसस्थानकांच्या बाहेरून या गाड्या सोडण्यात येत होत्या. या गाड्यांमुळे प्रवाशांना फायदा झाला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारीदेखील बसस्थानकात उपस्थित राहून ग्रामीण भागातील महिला प्रवाशांना मार्गदर्शन करत होते.

पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. मात्र, खासगी गाड्या आपल्या गावातील मार्गावर जात असल्याची माहिती मिळताच हातातील पिशव्या सांभाळत वाहन पकडण्यासाठी मंडळी धावत होती.संपाला खेड व गुहागर आगारातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने एकही गाडी सुटू शकली नाही. चिपळुणातून केवळ एकच गाडी सुटली. मात्र, रत्नागिरी शहरी मार्गावरील फेऱ्यावर संपाचा कोणताही परिणाम जाणवला नाही. २१६पैकी १७९ फेऱ्या सुटल्या. लांजा आगारातून १२६ पैकी ११६ फेऱ्या सुटल्या. अन्य आगारातील कर्मचारी संपात असल्यामुळे मोजक्याच कर्मचाऱ्यामुळे काही फेऱ्या सुटल्या. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी