शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

रत्नागिरीतील पाणीटंचाई रोखण्यासाठी पावणेसहा कोटी रुपये मंजूर, टंचाई आराखडा निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:26 IST

केंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली

रत्नागिरी : गाव, वाडी, वस्त्यांवर जलजीवन योजना राबवण्यात येत असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे पाणीटंचाई कृती आराखडा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. अजूनही काही ३९५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असून, तेथील उपाययोजनांसाठी शासनाकडून ५ कोटी २२ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. टंचाई कृती आराखड्यातील विविध कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील २५७ गावातील ३९५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी ५ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषदेकडून शासनाला सादर करण्यात आला होता. हाच आराखडा गतवर्षी सुमारे १२ कोटी रुपयांचा होता. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा आराखडा तयार करुन तो प्रशासनाला सादर करण्यात येतो.

मात्र, यंदा  तालुकास्तरीय  आराखडे येण्यास विलंब झाला. त्यातही मंडणगड, खेड या तालुक्यातून आराखडा उशिरा आला. त्यामुळे जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यास विलंब झाला. त्यानंतर हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.टंचाईवर मात करण्यासाठी या आराखड्यात जिल्हा परिषदेने काही कामे सुचवली आहेत. त्यात जिल्ह्यात २५५ नवीन विंधन विहिरी बांधण्यात येणार आहेत. नळ दुरुस्तीची १७ कामे करण्यात येणार असून, ३४ विहिरीतील गाळ उपसा करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्तांसाठी तात्पुरत्या दोन पूरक नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहेत. तर संभाव्य ९९ गावातील  २७९ वाड्यांना  ३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी ७४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.जिल्ह्यात तब्बल ७०० कोटी रुपयांची कामे सुरूकेंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे वाड्या, वस्त्यांवर पाणी पुरवठा योजना नेण्यात येत असल्याने ही कामे सुरु झाली आहेत. त्या परिणाम चांगला झाला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईच्या आराखड्यामध्ये कपात झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी