शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरीतील पाणीटंचाई रोखण्यासाठी पावणेसहा कोटी रुपये मंजूर, टंचाई आराखडा निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:26 IST

केंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली

रत्नागिरी : गाव, वाडी, वस्त्यांवर जलजीवन योजना राबवण्यात येत असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे पाणीटंचाई कृती आराखडा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. अजूनही काही ३९५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असून, तेथील उपाययोजनांसाठी शासनाकडून ५ कोटी २२ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. टंचाई कृती आराखड्यातील विविध कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील २५७ गावातील ३९५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी ५ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषदेकडून शासनाला सादर करण्यात आला होता. हाच आराखडा गतवर्षी सुमारे १२ कोटी रुपयांचा होता. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा आराखडा तयार करुन तो प्रशासनाला सादर करण्यात येतो.

मात्र, यंदा  तालुकास्तरीय  आराखडे येण्यास विलंब झाला. त्यातही मंडणगड, खेड या तालुक्यातून आराखडा उशिरा आला. त्यामुळे जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यास विलंब झाला. त्यानंतर हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.टंचाईवर मात करण्यासाठी या आराखड्यात जिल्हा परिषदेने काही कामे सुचवली आहेत. त्यात जिल्ह्यात २५५ नवीन विंधन विहिरी बांधण्यात येणार आहेत. नळ दुरुस्तीची १७ कामे करण्यात येणार असून, ३४ विहिरीतील गाळ उपसा करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्तांसाठी तात्पुरत्या दोन पूरक नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहेत. तर संभाव्य ९९ गावातील  २७९ वाड्यांना  ३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी ७४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.जिल्ह्यात तब्बल ७०० कोटी रुपयांची कामे सुरूकेंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे वाड्या, वस्त्यांवर पाणी पुरवठा योजना नेण्यात येत असल्याने ही कामे सुरु झाली आहेत. त्या परिणाम चांगला झाला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईच्या आराखड्यामध्ये कपात झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी