शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

रत्नागिरीतील पाणीटंचाई रोखण्यासाठी पावणेसहा कोटी रुपये मंजूर, टंचाई आराखडा निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:26 IST

केंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली

रत्नागिरी : गाव, वाडी, वस्त्यांवर जलजीवन योजना राबवण्यात येत असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे पाणीटंचाई कृती आराखडा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. अजूनही काही ३९५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असून, तेथील उपाययोजनांसाठी शासनाकडून ५ कोटी २२ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. टंचाई कृती आराखड्यातील विविध कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील २५७ गावातील ३९५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी ५ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषदेकडून शासनाला सादर करण्यात आला होता. हाच आराखडा गतवर्षी सुमारे १२ कोटी रुपयांचा होता. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा आराखडा तयार करुन तो प्रशासनाला सादर करण्यात येतो.

मात्र, यंदा  तालुकास्तरीय  आराखडे येण्यास विलंब झाला. त्यातही मंडणगड, खेड या तालुक्यातून आराखडा उशिरा आला. त्यामुळे जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यास विलंब झाला. त्यानंतर हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.टंचाईवर मात करण्यासाठी या आराखड्यात जिल्हा परिषदेने काही कामे सुचवली आहेत. त्यात जिल्ह्यात २५५ नवीन विंधन विहिरी बांधण्यात येणार आहेत. नळ दुरुस्तीची १७ कामे करण्यात येणार असून, ३४ विहिरीतील गाळ उपसा करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्तांसाठी तात्पुरत्या दोन पूरक नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहेत. तर संभाव्य ९९ गावातील  २७९ वाड्यांना  ३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी ७४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.जिल्ह्यात तब्बल ७०० कोटी रुपयांची कामे सुरूकेंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे वाड्या, वस्त्यांवर पाणी पुरवठा योजना नेण्यात येत असल्याने ही कामे सुरु झाली आहेत. त्या परिणाम चांगला झाला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईच्या आराखड्यामध्ये कपात झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी