शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

कर्मचाऱ्यांमध्ये समाधान रत्नागिरी : मार्चपासून प्रलंबित राहिलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अखेर जमा झाले आहे. यासाठी कृती समितीने शासन स्तरावर ...

कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

रत्नागिरी : मार्चपासून प्रलंबित राहिलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अखेर जमा झाले आहे. यासाठी कृती समितीने शासन स्तरावर पाठपुरावा केला असता त्यानुसार आठ दिवसांपूर्वी मार्चचे तर दोन दिवसांपूर्वी एप्रिलचे मानधन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

खांब बदलण्याची मागणी

राजापूर : तालुक्यातील उपळे परिसरातील गंजलेले विद्युत खांब व लोंबकळत असलेल्या विद्युत तारा तसेच रस्त्यातील तसेच घरांना अडथळे ठरत असलेले पोल बदलण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येऊनदेखील त्याची दखल घेतली जात नाही. पावसाळा तोंडावर असल्याने पुढील अपघाताचा धोका टाळण्यासाठी तातडीने जीर्ण खांब व वाहिन्या बदलण्याची मागणी होत आहे.

जीवनावश्यक वस्तू वाटप

देवरुख : स्वराज्य संघटना कोकण या युवक संघटनेतर्फे कडवई पंचक्रोशीतील चिखली गावातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटना अध्यक्ष अविनाश गुरव, सिद्धेश जाधव, विशाल शिवलकर, अक्षय मोहिते, प्रशांत बोंबले, सुयश गुरव यांनी गरजूंच्या घरी जाऊन साहित्य वाटप केले.

मोबाइल टॉवरची मागणी

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडीसह राजीवली, रातांबी, पाचांबे, कुचांबे, कुंभारखणी, कुटरे, येगाव, मुरडव आदी गावांमध्ये मोबाइलची सेवा देण्यासाठी मोबाइल टॉवर उभारणीची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने भारत संचार निगमला पत्र दिले असून तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

भरती प्रक्रिया

रत्नागिरी : रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाकसेवकांची एकूण १९५ पदे रिक्त असून विविध प्रवर्गातून ती भरण्यात येणार आहेत. ग्रामीण डाकसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाल्याने अर्ज ऑनलाइन करावयाचा आहे. २६ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवोद्योजकांसाठी वेबिनार

रत्नागिरी : महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेतर्फे वेबिनार आयोजित केले आहे. दिनांक १८ ते २० मेअखेर दुपारी ३ ते ४ या वेळेत वेबिनार होणार असून विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

थांब्याची मागणी

रत्नागिरी : मडगाव ते नागपूर या सुरू असलेल्या विशेष रेल्वेला पेण, चाळीसगाव, जळगाव, शेगाव, मुर्तुझापूर या ठिकाणी अधिकृत थांबे देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. जिल्ह्यात अनेक कर्मचारी, अधिकारी नागपूर परिसरातील आहेत. त्यामुळे अधिकृत थांबे देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.