शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

कर्मचाऱ्यांमध्ये समाधान रत्नागिरी : मार्चपासून प्रलंबित राहिलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अखेर जमा झाले आहे. यासाठी कृती समितीने शासन स्तरावर ...

कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

रत्नागिरी : मार्चपासून प्रलंबित राहिलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अखेर जमा झाले आहे. यासाठी कृती समितीने शासन स्तरावर पाठपुरावा केला असता त्यानुसार आठ दिवसांपूर्वी मार्चचे तर दोन दिवसांपूर्वी एप्रिलचे मानधन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

खांब बदलण्याची मागणी

राजापूर : तालुक्यातील उपळे परिसरातील गंजलेले विद्युत खांब व लोंबकळत असलेल्या विद्युत तारा तसेच रस्त्यातील तसेच घरांना अडथळे ठरत असलेले पोल बदलण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येऊनदेखील त्याची दखल घेतली जात नाही. पावसाळा तोंडावर असल्याने पुढील अपघाताचा धोका टाळण्यासाठी तातडीने जीर्ण खांब व वाहिन्या बदलण्याची मागणी होत आहे.

जीवनावश्यक वस्तू वाटप

देवरुख : स्वराज्य संघटना कोकण या युवक संघटनेतर्फे कडवई पंचक्रोशीतील चिखली गावातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटना अध्यक्ष अविनाश गुरव, सिद्धेश जाधव, विशाल शिवलकर, अक्षय मोहिते, प्रशांत बोंबले, सुयश गुरव यांनी गरजूंच्या घरी जाऊन साहित्य वाटप केले.

मोबाइल टॉवरची मागणी

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडीसह राजीवली, रातांबी, पाचांबे, कुचांबे, कुंभारखणी, कुटरे, येगाव, मुरडव आदी गावांमध्ये मोबाइलची सेवा देण्यासाठी मोबाइल टॉवर उभारणीची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने भारत संचार निगमला पत्र दिले असून तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

भरती प्रक्रिया

रत्नागिरी : रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाकसेवकांची एकूण १९५ पदे रिक्त असून विविध प्रवर्गातून ती भरण्यात येणार आहेत. ग्रामीण डाकसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाल्याने अर्ज ऑनलाइन करावयाचा आहे. २६ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवोद्योजकांसाठी वेबिनार

रत्नागिरी : महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेतर्फे वेबिनार आयोजित केले आहे. दिनांक १८ ते २० मेअखेर दुपारी ३ ते ४ या वेळेत वेबिनार होणार असून विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

थांब्याची मागणी

रत्नागिरी : मडगाव ते नागपूर या सुरू असलेल्या विशेष रेल्वेला पेण, चाळीसगाव, जळगाव, शेगाव, मुर्तुझापूर या ठिकाणी अधिकृत थांबे देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. जिल्ह्यात अनेक कर्मचारी, अधिकारी नागपूर परिसरातील आहेत. त्यामुळे अधिकृत थांबे देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.