शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

कर्मचाऱ्यांमध्ये समाधान रत्नागिरी : मार्चपासून प्रलंबित राहिलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अखेर जमा झाले आहे. यासाठी कृती समितीने शासन स्तरावर ...

कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

रत्नागिरी : मार्चपासून प्रलंबित राहिलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अखेर जमा झाले आहे. यासाठी कृती समितीने शासन स्तरावर पाठपुरावा केला असता त्यानुसार आठ दिवसांपूर्वी मार्चचे तर दोन दिवसांपूर्वी एप्रिलचे मानधन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

खांब बदलण्याची मागणी

राजापूर : तालुक्यातील उपळे परिसरातील गंजलेले विद्युत खांब व लोंबकळत असलेल्या विद्युत तारा तसेच रस्त्यातील तसेच घरांना अडथळे ठरत असलेले पोल बदलण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येऊनदेखील त्याची दखल घेतली जात नाही. पावसाळा तोंडावर असल्याने पुढील अपघाताचा धोका टाळण्यासाठी तातडीने जीर्ण खांब व वाहिन्या बदलण्याची मागणी होत आहे.

जीवनावश्यक वस्तू वाटप

देवरुख : स्वराज्य संघटना कोकण या युवक संघटनेतर्फे कडवई पंचक्रोशीतील चिखली गावातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटना अध्यक्ष अविनाश गुरव, सिद्धेश जाधव, विशाल शिवलकर, अक्षय मोहिते, प्रशांत बोंबले, सुयश गुरव यांनी गरजूंच्या घरी जाऊन साहित्य वाटप केले.

मोबाइल टॉवरची मागणी

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडीसह राजीवली, रातांबी, पाचांबे, कुचांबे, कुंभारखणी, कुटरे, येगाव, मुरडव आदी गावांमध्ये मोबाइलची सेवा देण्यासाठी मोबाइल टॉवर उभारणीची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने भारत संचार निगमला पत्र दिले असून तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

भरती प्रक्रिया

रत्नागिरी : रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाकसेवकांची एकूण १९५ पदे रिक्त असून विविध प्रवर्गातून ती भरण्यात येणार आहेत. ग्रामीण डाकसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाल्याने अर्ज ऑनलाइन करावयाचा आहे. २६ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवोद्योजकांसाठी वेबिनार

रत्नागिरी : महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेतर्फे वेबिनार आयोजित केले आहे. दिनांक १८ ते २० मेअखेर दुपारी ३ ते ४ या वेळेत वेबिनार होणार असून विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

थांब्याची मागणी

रत्नागिरी : मडगाव ते नागपूर या सुरू असलेल्या विशेष रेल्वेला पेण, चाळीसगाव, जळगाव, शेगाव, मुर्तुझापूर या ठिकाणी अधिकृत थांबे देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. जिल्ह्यात अनेक कर्मचारी, अधिकारी नागपूर परिसरातील आहेत. त्यामुळे अधिकृत थांबे देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.